वीज पडून १० शेळ्यांसह २ मेंढ्याचा मृत्यू, ४ मेंढ्या जखमी

  78

नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाडावर वीज पडून १२ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरच्या वीज पडून झालेल्या दुर्घटनेत संतोष खरात,रामकिसन खोसे, सचिन खोसे, अक्षय पंडित, बाबासाहेब पंडित, अजित पंडित या मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


सदरच्या झालेल्या दुर्घटनेने रांजणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रांजणगावदेवी येथील सहा कुटंबातील सदस्य सामाजिक वनीकरणाच्या परिसरात सुमारे २०० शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज पडून १० शेळ्या आणि २ मेंढ्या मृत झाल्या असून ४ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.


घटनेची माहिती कळताच रांजणगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नेवासा पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृत शेळ्या मेंढ्यांचे शिवविच्छेदन केले. तर घटनेची माहिती मिळतात धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळांशी घडलेल्या दुर्घटने विषयी चर्चा करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा