वीज पडून १० शेळ्यांसह २ मेंढ्याचा मृत्यू, ४ मेंढ्या जखमी

नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाडावर वीज पडून १२ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरच्या वीज पडून झालेल्या दुर्घटनेत संतोष खरात,रामकिसन खोसे, सचिन खोसे, अक्षय पंडित, बाबासाहेब पंडित, अजित पंडित या मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


सदरच्या झालेल्या दुर्घटनेने रांजणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रांजणगावदेवी येथील सहा कुटंबातील सदस्य सामाजिक वनीकरणाच्या परिसरात सुमारे २०० शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज पडून १० शेळ्या आणि २ मेंढ्या मृत झाल्या असून ४ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.


घटनेची माहिती कळताच रांजणगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नेवासा पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृत शेळ्या मेंढ्यांचे शिवविच्छेदन केले. तर घटनेची माहिती मिळतात धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळांशी घडलेल्या दुर्घटने विषयी चर्चा करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला