नवी दिल्ली : मुंबईत (Mumbai) शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde Group) गट १५ जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईतील एकूण १७ जागांवर काही महिन्यांपूर्वी शिवसेनेनं निरीक्षक नेमले होते. आता या १७ पैकी १५ जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. तसेच, उर्वरित जागा भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला (NCP) मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील महायुतीचा (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईत शिंदे गट १५ जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती, तर भाजप १७ किंवा १८ जागा आणि राष्ट्रवादी ३ किंवा ४ जागांवर लढण्याची शक्यता आहे.
शिवसेना : १५ जागा
भाजप : १७ किंवा १८ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : ३ किंवा ४ जागा
भायखळा, वरळी, शिवडी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्ती नगर, धारावी, भांडुप पश्चिम, माहीम, विक्रोळी, मागठाणे, चांदिवली, कलिना, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, या १७ जागांवर शिवसेनेनं निरीक्षक नेमले होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी या निरिक्षकांची निवड करण्यात आली होती.
विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फार पूर्वीच कंबर कसली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यात ११३ विधानसभा मतदारसंघातील ४६ विधानसभा प्रभारी जाहीर केल्या होत्या. तसेच, ९३ विधानसभा निरीक्षकपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या.
महायुतीतमधल्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागांबाबत दिल्लीमध्ये अमित शाहांच्या समक्ष चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शाहांसोबत अडीच तास चर्चा झाली. जागावाटपाचा तिढा आता तीनही नेत्यांनी सोडवला असल्याची माहिती आहे. आता फक्त काही जागांचाच प्रश्न बाकी आहे अशी माहिती दिल्लीतून समजतेय.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…