आम्ही आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवलं’

सोलापूर (प्रतिनिधी): मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीने त्याग केला ही एक बाजू असली तरी आम्ही आमच्या आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणले म्हणूनच भाजपा आज सत्तेत असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या त्याग केल्याच्या वक्तव्याला आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.


“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला होता”, असे शहाजी बापू पाटील म्हणाले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी आमच्या शिवसैनिकांची भावना आहे. मात्र महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता होण्यावरून मतभेद निर्माण होणार आणि फूट पडणार”, असे सांगत, राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी सर्वजण राजकारणात प्रयत्न करत असतात. मात्र सांगोल्यातील टेंभू म्हैसाळ या पाण्याच्या योजनांना निधी मीच आणल्याचा दावा आमदार शहाजी भाऊ पाटील यांनी केला. सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि माझ्यात चर्चा सुरू आहे. लवकरच दीपक आबा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतील अशी मला आशा असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maratha Reservation : मराठा समाजासाठी महायुती सरकारएवढे निर्णय कोणीही घेतले नाहीत!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुणाला न्याय मिळत नसल्याची भावना असेल, तर संवादातून मार्ग काढू मुंबई : "मराठा

Nitesh Rane : सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

राज्यातील बंदर विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्राधान्याने मंजुरीची मागणी केंद्रीय बंदरे,

Public Examinations Bill 2026 : पेपरफुटीला बसणार चाप! अखेर 'सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक २०२६' लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : देशात वारंवार उघडकीस येणाऱ्या पेपरफुटीच्या घटना आणि परीक्षांमधील गैरप्रकारांना कायमचा आळा

Custodial Death : पोलिसांच्या ताब्यातील प्रत्येक मृत्यू आता 'कोठडी मृत्यू'च!; राज्य सरकारचा निर्णय

शवविच्छेदन आणि पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक मुंबई : पोलीस कोठडीतील मृत्यूच्या (Custodial Death) प्रत्येक

Girish Mahajan : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सोडू नका!- मंत्री गिरीश महाजन

शाळा-कॉलेजशी दूरचा संबंध नसलेल्यांची घुसखोरी मुंबई : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा (Protest) राजकीय फायदा

Ram Kulkarni : 'नेरळकर कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप'; हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

मुंबई : बारावीतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकारण