पालघर जिल्ह्यात शह-काटशहाचे राजकारण

पालघर (प्रतिनिधी): पालघर जिल्ह्यात शह-काटशहच्या राजकारणाला प्रचंड उधाण आले आहे.कोण कोणासोबत आहे,या विषयावर सतत चर्चा रंगू लागली आहे. पण कोणताही निर्णय दृष्टीक्षेपात येत नसल्यामुळे अनेक राजकीय  नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते आता संभ्रमावस्थेत सापडले आहेत. दररोज वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यामुळे प्रत्येक जण सध्या आपण काय करायचे?,अशा विवंचनेत सापडला आहे.समाजमाध्यमे मात्र या परिस्थितीचा फायदा घेत आग लावण्याचे काम करत आहेत. मुलाखती घेण्याच्या नावाखाली अनेक पत्रकार या सर्व घडामोडींना हवा देत आहेत. त्यामुळे समज व गैरसमज वाढू लागले आहेत.या सर्व घडामोडीबाबत आ.हितेंद्र ठाकूर व माजी महापौर राजीव पाटील हे दोघेही चकार शब्द बोलायला तयार नाहीत. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यानी होर्डिंग व बॅनर्सवरील दोघांचे एकत्रितपणे फोटो लावणे टाळले आहे. राजीव पाटील हे लवकरच भाजपमध्ये सामील होतील व त्यांच्यासमवेत नालासोपारा शहरातील १० ते १२ नगरसेवक देखील प्रवेश करतील,अशी चर्चा सर्वत्र होत आहे.


गेल्या सात दिवसापासून हा धुरळा उडत असून प्रत्यक्षात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया कोणाकडूनही व्यक्त करण्यात आलेली नाही. तसेच राजीव पाटील व त्यांचे १० ते १२ माजी नगरसेवक यांचा भाजपमध्ये प्रवेश,याविषयी भाजपचे स्थानिक नेत्यापैकी एकही जण माध्यमांशी बोलायला तयार नाही. तसेच मुंबई व दिल्लीच्या राजकीय आघाडीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.भाजपचे वरिष्ठ नेते सध्या जागावाटपाच्या कामात गुंतून पडले आहेत,त्यामुळे या विषयात ज्येष्ठ नेते लक्ष घालत नसल्याचे स्पष्ट होत आहे.निर्णय सतत लांबणीवर पडत असल्यामुळे कार्यकर्ते मात्र विमनस्क अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना कोर्टाचा दणका!

शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो दाखल, बच्चू कडूंना आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे

लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी