Salman Khan : सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील!

बिष्णोई गँगकडून सलमान खानला धमकी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. मात्र बाबा सिद्दीकी यांच्यावर जीवघेणा हल्लानंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगने (Lawrence Bishnoi) पुन्हा एकदा सलमान खानला (Salman Khan) धमकी दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काळवीट हत्येप्रकरणी ताणला गेलेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. बिष्णोई गँग आणि या गँगशी संबंधित असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या एका जवळील व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदेशाच्या माध्यमातून सलमान खानला धमकी दिली आहे.



धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटले?


मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला. यामध्ये लॉरेन्स बिष्णोईशी असलेले वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्याने पैसे दिले नाही तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर संरक्षण यंत्रणाही आता अधिकच सतर्क झाली आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य