Salman Khan : सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील!

बिष्णोई गँगकडून सलमान खानला धमकी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. मात्र बाबा सिद्दीकी यांच्यावर जीवघेणा हल्लानंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगने (Lawrence Bishnoi) पुन्हा एकदा सलमान खानला (Salman Khan) धमकी दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काळवीट हत्येप्रकरणी ताणला गेलेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. बिष्णोई गँग आणि या गँगशी संबंधित असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या एका जवळील व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदेशाच्या माध्यमातून सलमान खानला धमकी दिली आहे.



धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटले?


मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला. यामध्ये लॉरेन्स बिष्णोईशी असलेले वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्याने पैसे दिले नाही तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर संरक्षण यंत्रणाही आता अधिकच सतर्क झाली आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी