Salman Khan : सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील!

बिष्णोई गँगकडून सलमान खानला धमकी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. मात्र बाबा सिद्दीकी यांच्यावर जीवघेणा हल्लानंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगने (Lawrence Bishnoi) पुन्हा एकदा सलमान खानला (Salman Khan) धमकी दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काळवीट हत्येप्रकरणी ताणला गेलेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. बिष्णोई गँग आणि या गँगशी संबंधित असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या एका जवळील व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदेशाच्या माध्यमातून सलमान खानला धमकी दिली आहे.



धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटले?


मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला. यामध्ये लॉरेन्स बिष्णोईशी असलेले वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्याने पैसे दिले नाही तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर संरक्षण यंत्रणाही आता अधिकच सतर्क झाली आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.