भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन


मुंबई (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या काही दिवसातच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी सहकार, बाल कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण, सामाजिक न्याय यासह १८ महत्वाच्या घटकांचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाशासित राज्यांतील उत्तम तरतुदीही समाविष्ट केल्या जातील. जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे हे पाहण्यासाठी विभागनिहाय समित्या नेमण्यात येतील. अँल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे सारे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टिनेही व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.


मुनगंटीवार म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण शक्तिनिशी काम करण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारच्या कार्यकाळात दरडोई उत्पन्नात वाढ झाली. गेल्या ५४ वर्षांत जे झाले नाही ते आमच्या साडेसात वर्षांच्या कालावधीत झाले. भाजपाचा जाहीरनामा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नसून कायमस्वरुपी त्यात वाढ होत राहील. नागरीकांना संवादातून समाधान आणि प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.

Comments
Add Comment

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयतानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधीवर हल्लाबोल

पाटणा : बिहार विधानसभेच्या निकालांत एनडीएला मोठं यश मिळाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

अजित पवारांवर आली नामुष्की, स्वप्न अपूर्णच राहिले

पाटणा : आधी राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वात भाजपचा प्रभाव वाढल्यामुळे

बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय जनता पार्टी (BJP) बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष

“२५ वर्षे मुंबई महापालिका लुटली” अमित साटमांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष वार

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आता पक्षाने थेट

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर