भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन


मुंबई (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या काही दिवसातच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी सहकार, बाल कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण, सामाजिक न्याय यासह १८ महत्वाच्या घटकांचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाशासित राज्यांतील उत्तम तरतुदीही समाविष्ट केल्या जातील. जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे हे पाहण्यासाठी विभागनिहाय समित्या नेमण्यात येतील. अँल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे सारे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टिनेही व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.


मुनगंटीवार म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण शक्तिनिशी काम करण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारच्या कार्यकाळात दरडोई उत्पन्नात वाढ झाली. गेल्या ५४ वर्षांत जे झाले नाही ते आमच्या साडेसात वर्षांच्या कालावधीत झाले. भाजपाचा जाहीरनामा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नसून कायमस्वरुपी त्यात वाढ होत राहील. नागरीकांना संवादातून समाधान आणि प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.

Comments
Add Comment

शरद पवारांची अजित पवारांसोबत आघाडी फिस्कटली, मविआसोबत जाण्याची तयारी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय

महायुतीचे मुंबईतील जागावाटप ठरले

आता उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू ; बावनकुळे मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप

महायुतीचा फॉर्म्युला ठरला

मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप १४०, शिवसेना ८७ जागा लढणार? राष्ट्रवादीच्या महायुतीमधील समावेशाची शक्यता

Nitesh Rane : "जो हिंदू हित की बात करेगा..." मंत्री नितेश राणेंच्या ट्विटने विरोधकांचे धाबे दणाणले

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आता पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेतला असून, पक्षाचे

दंगलीतील आरोपीला प्रवेश देणे हा शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा अपमान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जोडे चाटून मते मिळवण्याचे राजकारण महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे नाही मुंबई :

पश्चिम बंगालचा बांगलादेश बनू देऊ नका : मिथुन चक्रवर्ती यांची तृणमूल काँग्रेसवर टीका

कोलकता : अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) विरोधात तीव्र हल्ला चढवला आहे.