जागावाटपावरून मविआत धुसफूस

समाजवादी पार्टीचा राज्यातील १२ जागांवर डोळा


 

मुंबई (प्रतिनिधी): विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली, त्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांच्या बैठक होत आहे. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केलं. आम्ही महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे, असं विधान त्यांनी केलं.

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरूवारी लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना इंडिया आघाडी जोरदारपणे काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, मी उद्या महाराष्ट्रात जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्यात आमचे दोन आमदार आहेत. आम्हाला आशा आहे की, यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही पूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. त्यापैकी अबू आझमी हे शिवाजी नगरचे तर रईस शेख हे भिवंडीचे आमदार आहेत. यंदा सपाचा महाराष्ट्रातील १०-१२ जागांवर डोळा आहे.
यामध्ये मुस्लिम आणि युपीचे लोक मोठ्या संख्येने राहतात अशा ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, महाविकास विकास आघाडीत सपाला ३-४ जागा मिळू शकतात, अशी चर्चा आहे.

अबू आझमींचा मविआला इशारा…


महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या आघाडीत समाजवादी पक्षाचा अपमान करू नये. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र समाजवादी पक्षाला एकाच बैठकीत बोलावण्यात आले आणि केवळ १५ मिनिटे चर्चा झाली. समाजवादी पक्ष हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्याला हलक्यात घेऊ नये, जर समाजवादी पार्टीला विश्वासात घेतले नाही आणि योग्य वाटा दिला नाही तर स्वबळावर लढू, असा इशारा आझमींनी दिला.
Comments
Add Comment

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख

महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- हिंदी सक्तीच्या निर्णयावर सही उद्धव ठाकरेंची मुंबई : "महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदी सक्तीबाबत निर्णय

योग्य इतिहास शिकवला असता तर औरंगजेब एकाही मुसलमानाचा हिरो नसता! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- ७५ हजार हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूची शिवरायांशी बरोबरी खपवून घेणार नाही मुंबई : "देशाचा खरा इतिहास ७० वर्षे

Budget Session : पोलादपूर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणार; अधिवेशन काळातच विशेष बैठकीचे आयोजन

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. भाजप

Budget Session : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ‘सेफ्टी ऑडिट’ होणार; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा

- सहा महिन्यांत अहवाल सादर करणार मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी आणलेल्या आरोपींनी पलायन