धक्कादायक! बिहारमध्ये विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू

  73

पाटणा : बिहारमधील उत्तर प्रदेशच्या (UP-Bihar) सीमेला लागून असलेल्या सिवान, सारण जिल्ह्यात मंगळवारी रात्री विषारी दारू सेवन (Alcohol Drinking) केल्यामुळे अनेकजणांना विषबाधा (poisoning) झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तपास करता सारण आणि सिवानचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी सर्वांना संशयास्पद शितपेय सेवन केल्यामुळे विषबाधेचा प्रकार घडला असावा अशी माहिती मिळाली.


या घटनेत आतापर्यंत २५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील १० ते १२ दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच विक्रेत्यांकडे दारू किंवा स्पिरीटचा पुरवठा केला जात असण्याबाबत कडक तपासही घेतला जात आहे.


दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एडीएमच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले आहे. तर राज्यस्तरावरही दारूबंदी विभागाचे पथक देखील या तपासासाठी पोहोचणार आहे. या घटनेत विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची खात्री पटल्यास पुरवठादारास अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सारणचे डीएम अमन समीर आणि सिवानचे जिल्हाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी दिली.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व