धक्कादायक! बिहारमध्ये विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू

पाटणा : बिहारमधील उत्तर प्रदेशच्या (UP-Bihar) सीमेला लागून असलेल्या सिवान, सारण जिल्ह्यात मंगळवारी रात्री विषारी दारू सेवन (Alcohol Drinking) केल्यामुळे अनेकजणांना विषबाधा (poisoning) झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तपास करता सारण आणि सिवानचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी सर्वांना संशयास्पद शितपेय सेवन केल्यामुळे विषबाधेचा प्रकार घडला असावा अशी माहिती मिळाली.


या घटनेत आतापर्यंत २५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील १० ते १२ दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच विक्रेत्यांकडे दारू किंवा स्पिरीटचा पुरवठा केला जात असण्याबाबत कडक तपासही घेतला जात आहे.


दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एडीएमच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले आहे. तर राज्यस्तरावरही दारूबंदी विभागाचे पथक देखील या तपासासाठी पोहोचणार आहे. या घटनेत विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची खात्री पटल्यास पुरवठादारास अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सारणचे डीएम अमन समीर आणि सिवानचे जिल्हाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी दिली.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१