धक्कादायक! बिहारमध्ये विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू

  93

पाटणा : बिहारमधील उत्तर प्रदेशच्या (UP-Bihar) सीमेला लागून असलेल्या सिवान, सारण जिल्ह्यात मंगळवारी रात्री विषारी दारू सेवन (Alcohol Drinking) केल्यामुळे अनेकजणांना विषबाधा (poisoning) झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तपास करता सारण आणि सिवानचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी सर्वांना संशयास्पद शितपेय सेवन केल्यामुळे विषबाधेचा प्रकार घडला असावा अशी माहिती मिळाली.


या घटनेत आतापर्यंत २५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील १० ते १२ दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच विक्रेत्यांकडे दारू किंवा स्पिरीटचा पुरवठा केला जात असण्याबाबत कडक तपासही घेतला जात आहे.


दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एडीएमच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले आहे. तर राज्यस्तरावरही दारूबंदी विभागाचे पथक देखील या तपासासाठी पोहोचणार आहे. या घटनेत विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची खात्री पटल्यास पुरवठादारास अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सारणचे डीएम अमन समीर आणि सिवानचे जिल्हाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी दिली.

Comments
Add Comment

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती