धक्कादायक! बिहारमध्ये विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू

पाटणा : बिहारमधील उत्तर प्रदेशच्या (UP-Bihar) सीमेला लागून असलेल्या सिवान, सारण जिल्ह्यात मंगळवारी रात्री विषारी दारू सेवन (Alcohol Drinking) केल्यामुळे अनेकजणांना विषबाधा (poisoning) झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तपास करता सारण आणि सिवानचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी सर्वांना संशयास्पद शितपेय सेवन केल्यामुळे विषबाधेचा प्रकार घडला असावा अशी माहिती मिळाली.


या घटनेत आतापर्यंत २५ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील १० ते १२ दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच विक्रेत्यांकडे दारू किंवा स्पिरीटचा पुरवठा केला जात असण्याबाबत कडक तपासही घेतला जात आहे.


दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एडीएमच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले आहे. तर राज्यस्तरावरही दारूबंदी विभागाचे पथक देखील या तपासासाठी पोहोचणार आहे. या घटनेत विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची खात्री पटल्यास पुरवठादारास अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सारणचे डीएम अमन समीर आणि सिवानचे जिल्हाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी दिली.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने