Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदवार्ता! 'या' तारखेपासून पुन्हा रुळावर धावणार माथेरानची मिनीट्रेन

मुंबई : मुंबईकरांसाठी सर्वात जवळचे हिल स्टेशन (Hill Station) म्हणजे माथेरान (Matheran). या माथेरानचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांसाठी 'माथेरानची राणी' म्हणजेच मिनीट्रेन (Matheran Mini Train) उपलब्ध करु देण्यात आली आहे. नेरळ ते माथेरान अशा २१ किलोमीटरच्या प्रवासात डोंगर दऱ्या पाहत प्रवास करताना पर्यटकांना मोठा आनंद मिळतो. पावसाळ्याच्या कालावधीत घाटरस्ता आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे चार महिने ही मिनीट्रेन सेवा बंद ठेवण्यात येते. परंतु परतीच्या पावसानंतर दरवर्षी १५ ऑक्टोबरपासून मिनीट्रेनची सेवा प्रवाशांसाठी पुन्हा सुरु केली जाते. मात्र यंदा ही तारीख उलटून गेली तरीही मिनीट्रेन सुरु न केल्यामुळे पर्यटक नाराजीचा सूर मारत असताना आता लवकरच ही माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १ नोव्हेंबरपासून माथेरानची राणी पुन्हा धावण्यास सज्ज होणार आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे यंदा ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला असून सध्या परतीचा पाऊसही ओसरला आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच ही सेवा सुरु होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.


दरम्यान, पर्यटकांचा प्रतिसाद पाहता या मार्गावर फेऱ्या वाढवल्यास पर्यटनात आणखी वाढ होऊ शकते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,