गीतावेल

ज्ञानेश्वरी - प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


अठराव्या अध्यायाचा समारोप होतो आहे. तेव्हा ज्ञानदेव गीतेचा महिमा सांगत आहेत. त्या रसाळ ओव्या अशा आहेत.
‘किंवा अज्ञानरूपी जो अंधकार, त्याला प्रतिज्ञेने जिंकणारे हे सातशे श्लोक नसून हे सातशे सूर्यच श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपाने प्रकाशित केले आहेत.’ ओवी क्र. १६६७


‘किंवा संसारमार्गाने चालणाऱ्यांना जे श्रम झाले आहेत, त्यांचा परिहार होऊन विसावा घेण्याकरिता सातशे श्लोक हे द्राक्षांचे वेलच असून ते गीतारूप मांडवावर पसरले आहेत.’


ही मूळ ओवी अशी की,
‘श्लोकाक्षर द्राक्षलता। मांडव जाली आहे गीता।
संसारपथश्रांता। विसंबावया॥ ओवी क्र. १६६८
‘श्रांत’ शब्दाचा अर्थ आहे ‘थकलेले’.


अपार असे वेदवाङ्मय! त्याचे मंथन करून श्रीव्यासमुनींनी ते सूत्ररूपाने आणले ‘गीता’ या ग्रंथातून. संपूर्ण जीवनाचे सार सांगणाऱ्या या गीतेत सातशे श्लोक आहेत. हे श्लोक किती मौलिक आहेत, हे सांगताना माउलींनी अप्रतिम दृष्टान्त दिले आहेत. त्यांतील काही दाखले आता पाहूया-
ज्ञानदेव म्हणतात की, ‘हे श्लोक नव्हेत, तर श्रीकृष्णांनी प्रकाशित केलेले सातशे सूर्यच होय.


किती यथार्थ उपमा आहे ही! सूर्य हा तेजाचा गोळा! साऱ्या जगाचा अंधार नष्ट करून प्रकाशित करणारा तो सूर्य! या सूर्याप्रमाणे गीतेच्या एकेका श्लोकात शक्ती आहे. मानवी मनातील अज्ञान, अंधकार दूर करतो यातील प्रत्येक श्लोक. हे अज्ञान स्वतःविषयीचे तसेच सृष्टी विषयीचे आहे. ‘मी’ म्हणजे शरीर होय, कर्म करणारा मी आहे हासुद्धा भ्रम आहे. गीतेचा प्रत्येक श्लोक हा भ्रम दूर करतो. त्यामुळे माणसाचे मन उजळते. म्हणून गीता सांगणारे भगवान म्हणजे सूर्य उजळवणारे श्रीकृष्ण होय.


पुढची कल्पना केली आहे की, गीता हा मांडव आणि श्लोक ही द्राक्षांची वेल आहे. ही कल्पनाही किती साजेशी आहे! एरवी चालताना दमायला झाले की, माणूस विसावा घेतो एखाद्या बागेचा, सावलीचा. या संसारात चालताना विवंचनांनी माणूस मेटाकुटीला येतो. मग त्याला विसावा मिळतो गीतारूप मांडवातील श्लोकरूपी वेलीचा. वेल दिसायला नाजूक वाटते, पण बळकट असते. त्याप्रमाणे हे श्लोक आकाराने लहान आहेत, पण त्यांच्या ठायी अफाट शक्ती आहे मनपरिवर्तनाची! त्यात अर्क साठवलेला आहे तत्त्वज्ञानाचा! अजून एक सूचकता या दाखल्यात आहे. वेल हिरवीगार, रसरशीत असते. पुन्हा ही द्राक्षांची म्हणजे फळाची, गोडवा असलेली आहे. त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकांमध्ये मन उत्साहित, क्रियाशील करण्याची शक्ती आहे. माणसाला मार्गी लावून त्यांचे आयुष्य मधुर, रसाळ करण्याची शक्ती आहे.
इतक्या रसाळ भाषेत माऊलींनी गायिली आहे गीतेची महती!


ते पाहून सारे जन ‘गीता’ वाचती
ती वाचून सर्वांची स्थिर होते मती!


manisharaorane196@gmail.com

Comments
Add Comment

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,