Accident News : मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात

  170

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी राजश्री मुंडे (Rajshree Munde) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. पहाटे ४:३० वाजता कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात जयश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत.


ही दुर्घटना सोरतापवाडी या ठिकाणी घडली, जेथे महामार्गावर कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे अपघात गंभीर झाला. घटनास्थळी तातडीने स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू केले.


राजश्री मुंडे या अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती तपासून त्यांना काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या