महायुतीच्या जागावाटपावर दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; रंगणार उमेदवारीवर खलबतं

नवी दिल्ली : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत पोहोचले आहेत.


विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक संध्याकाळी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात होत आहे.


या बैठकीला पीएम मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सीईसी सदस्य उपस्थित आहेत.


बैठकीला जाताना बावनकुळे म्हणाले की, आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे, त्यात भाजपाच्या सध्याच्या जागेवर चर्चा होणार आहे. मला वाटतं, आमच्या पक्षाच्या बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत. आधी विद्यमान जागांवर निर्णय घ्यायचा आणि नंतर उर्वरित जागांवर निर्णय घ्यायचा आहे.


ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपण काही गोष्टी शिकलो आहोत. मोदीजींनी भारताचा विकास करण्याचे वचन दिले आहे, असे म्हणत आम्ही निवडणूक लढवली. आम्ही विकसित भारतासाठी मते मागत राहिलो आणि काँग्रेस पक्ष खोटे बोलत राहिला. काँग्रेसने जनतेत संभ्रम निर्माण केला. ते म्हणाले की, २०१४ साली भाजपाने महाराष्ट्रात २६० जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी १२२ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये १०५ जागा जिंकल्या होत्या. राज्यात भाजपाच सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला व आहे.

Comments
Add Comment

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू