Badlapur Returns : आचारसंहिता जाहीर होताच मुख्यमंत्र्यांना मोठे 'टेन्शन'

शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जामीन मिळताच ठाणेकर भडकले

ठाणे : तिकडे नवी दिल्लीत आचारसंहिता जाहीर होत असतानाच इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र खूप मोठ्या 'टेन्शन'मध्ये दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात 'बदलापूर रिटर्न्स' (Badlapur Returns) घडल्याचे मंगळवारी दिसून आले.


ठाण्यातील भंडार आळी भागात एका ११ वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग करणा-या आरोपीला जामीन दिल्यामुळे संतापलेल्या जमावाने पीडित चिमुकलीच्या माता-पित्यांसह ठाण्यातील शेकडो महिलांनी मंगळवारी ठिय्या मांडत आक्रोश केला. चिमुकलीसोबत गैरवर्तन करणारा आरोपी शिंदे गटाचा (Shinde Group) उपविभागप्रमुख असून सचिन यादव असे त्याचे नाव आहे.


अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याच्या या प्रकरणात आरोपी सचिन यादव (५५) याच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र विनयभंगाच्या आरोपीला जामीन मिळालाच कसा? असा सवाल लाडक्या बहिणींनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.


आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर ठाण्यात पीडितेच्या आई-वडिलांसह शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच, शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाला तत्काळ अटक करा, अशी मागणी मनसेचे पदाधिकारी आणि चिमुकलीच्या घरच्यांनी केली आहे.


ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. तेव्हा शिंदे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव याने त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीने त्या नराधमाला लांब ढककले. त्यानंतर संतापलेल्या सचिन यादवने अश्लील भाषेत भाष्य केले. पीडित मुलीने आपल्यासोबत झालेला प्रकार तात्काळ कुटुंबियांना सांगितला. या घटनेची गंभीर दाखल घेत पीडितेच्या कुटुंबियांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक देखील केली.


परंतु, विनयभंग करणा-या आरोपीला दुस-याच दिवशी जामीन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नराधमाला एकाच दिवसांत जामीन मंजूर होतोच कसा? असे मनसे नेते अविनाश जाधव आणि पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आज पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी केली.


एकीकडे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर आणि या आरोपीला पोलिसांकडून वेगळा न्याय का? असा संतप्त सवाल महिलांनी विचारला आहे.


दरम्यान, पीडित चिमुरड्याच्या कुटुंबियांना धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. तक्रार मागे घ्या अन्यथा तुमचे वाईट करू, अशा धमक्या पीडितेच्या कुटुंबियांना आल्यात. त्यामुळे मनसे पदाधिका-यांनी पीडितेच्या कुटुंबियांसोबत आंदोलन करत ठिय्या दिला. जर दोन दिवसांत त्या नराधमाला अटक केली नाही तर, भंडार आळीपासून ते मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही कॅन्डल मार्च काढू, असे यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.



पीडितेच्या कुटुंबियांच्या या आहेत चार मागण्या...



  • नराधम सचिन यादवला तत्काळ अटक करावी

  • थाथुरमाथूर कलमं लावली असल्यामुळे कलमांत वाढ करावी

  • हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवावे

  • जे कोणी धमक्या देत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत