Raju Shetty : राजू शेट्टींची मोठी उडी; स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार!

बेळगाव : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) कोणत्याही राजकीय पक्षाशी हातमिळवणी करणार नाही, तर स्वतंत्रपणे सर्व जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. याबाबत नियोजन सुरू असून लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.


महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे धोरण एकच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘परिवर्तन महाशक्ती’च्या नावाखाली राज्यातील छोटे पक्ष एकत्रित करून संघटना बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असणाऱ्या नेत्याची हत्या केली जात असेल तर सर्वसामान्यांचे रक्षण हे सरकार काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Dhule-Solapur highway : भरधाव कारने दुचाकीला उडवले; १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

आडूळ (ता. पैठण): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ फाटा येथे बुधवारी (दि. १७) दुपारी भरधाव कारने दुचाकीला

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक'जवळ भीषण साखळी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

लोणी काळभोर/बोरघाट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि नुकत्याच सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'

Ramdara Mandir : रामदरा शिवालयाचे गर्भगृह नूतनीकरण; १८ जुलैपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद

लोणी काळभोर (पुणे): पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण आणि

Pandharpur Crime : धक्कादायक! रेल्वे रुळांजवळ मृतदेह, तुटलेला पाय घराच्या दरवाज्यात टांगलेला अवस्थेत

पंढरपूर पोलिसांसमोर गूढ वाढले पंढरपूर : धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू  (Railway Accident Death)

Jalgaon : आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, अमळनेर रेल्वे स्थानकात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे

Drinking Water Policy : ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नवे धोरण; दरमहा 150 ते 400 रुपये पाणीपट्टी आकारणार

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य