Air India Bomb Threat: धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

  71

दिल्लीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बाँब असल्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली, त्यांनतर एअर इंडियाच्या विमानाचे दिल्लीत इमर्जन्ससी लँडिग करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर बचाव पथकाने विमानाची झाडाझडती घेतली, मात्र कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.


सोमवारी सकाळी दिल्लीच्या IGI विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर हे लँडिंग करण्यात आले. मुंबईहून न्यूयॉर्कला हे विमान जात होते. एअर इंडियाचे विमान सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने दिल्लीकडे वळवण्यात आले. विमान सध्या दिल्ली विमानतळावर असून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जात आहे.



एअर इंडियाकडून निवेदन..


एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, '१४ ऑक्टोबर रोजी मुंबईहून JFK ला उड्डाण करणारे विमान AI119 ला विशेष सुरक्षा इशारा मिळाला आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार ते दिल्लीकडे वळवण्यात आले. सर्व प्रवासी उतरले असून दिल्ली विमानतळ टर्मिनलवर आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मैदानावरील आमचे सहकारी आहेत ते प्रयत्न करत आहेत. एअर इंडिया आपल्या प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य देते.




दरम्यान, गेल्या महिन्यातसुद्धा मुंबईहून आलेल्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानाच्या वॉशरूममध्ये टिश्यू पेपरवर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचे लिहिलेले आढळून आले. यानंतर तातडीने कारवाई करून नंतर लँडिंग करण्यात आले.


Comments
Add Comment

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला