Air India Bomb Threat: धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्लीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बाँब असल्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली, त्यांनतर एअर इंडियाच्या विमानाचे दिल्लीत इमर्जन्ससी लँडिग करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर बचाव पथकाने विमानाची झाडाझडती घेतली, मात्र कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.


सोमवारी सकाळी दिल्लीच्या IGI विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर हे लँडिंग करण्यात आले. मुंबईहून न्यूयॉर्कला हे विमान जात होते. एअर इंडियाचे विमान सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने दिल्लीकडे वळवण्यात आले. विमान सध्या दिल्ली विमानतळावर असून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जात आहे.



एअर इंडियाकडून निवेदन..


एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, '१४ ऑक्टोबर रोजी मुंबईहून JFK ला उड्डाण करणारे विमान AI119 ला विशेष सुरक्षा इशारा मिळाला आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार ते दिल्लीकडे वळवण्यात आले. सर्व प्रवासी उतरले असून दिल्ली विमानतळ टर्मिनलवर आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मैदानावरील आमचे सहकारी आहेत ते प्रयत्न करत आहेत. एअर इंडिया आपल्या प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य देते.




दरम्यान, गेल्या महिन्यातसुद्धा मुंबईहून आलेल्या एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानाच्या वॉशरूममध्ये टिश्यू पेपरवर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचे लिहिलेले आढळून आले. यानंतर तातडीने कारवाई करून नंतर लँडिंग करण्यात आले.


Comments
Add Comment

AAP Sarpanch Shot in Amritsar : अमृतसरमध्ये थरार! लग्नमंडपात घुसून 'आप' नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या; अवघ्या १३ सेकंदात आरोपी पसार

चंदीगड : पंजाबमध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली

आसाममध्ये भल्या पहाटे भूकंप! नागरिकांची उडाली धावपळ; वाचा सविस्तर

गुवाहाटी : आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

PM modi on Somnath Temple : विध्वंस नव्हे, हा तर स्वाभिमानाचा विजय! सोमनाथच्या १००० वर्षांच्या अढळ विश्वासावर पंतप्रधान मोदींचा विशेष लेख

पाटण : गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आणि कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिरावर

एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स' सज्ज

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेप नवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत

कुटुंबातील घट्ट नाती ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखू शकतात: मोहन भागवत

भोपाळ : एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहादसारख्या घटना रोखू शकतात.

‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि