Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षेत वाढ!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर काल संशयित आरोपींकडून गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Group) बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारानंतर देशभरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.



वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून नाकाबंदी करण्याच्या सूचना


बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या हल्यानंतर मलबार हिल परिसरातील मंत्र्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेरही पोलीस तैनात केले आहेत. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मलबार हिल परिसरातील महत्वाच्या पाँईंटवर नाकाबंदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.



सोशल मीडियाद्वारे लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर २८ तासांनी लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, असे जबाबदारी घेताना त्यांनी म्हटले आहे.


Comments
Add Comment

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त

मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर; महापालिका राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर

अजित पवारांच्या खासगी सचिवाची कसून चौकशी

मुंबई : अजित पवारांचे बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान अपघातात निधन झाले. या प्रकरणी राज्याच्या गुन्हे