Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षेत वाढ!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर काल संशयित आरोपींकडून गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Group) बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारानंतर देशभरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.



वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून नाकाबंदी करण्याच्या सूचना


बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या हल्यानंतर मलबार हिल परिसरातील मंत्र्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेरही पोलीस तैनात केले आहेत. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मलबार हिल परिसरातील महत्वाच्या पाँईंटवर नाकाबंदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.



सोशल मीडियाद्वारे लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर २८ तासांनी लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, असे जबाबदारी घेताना त्यांनी म्हटले आहे.


Comments
Add Comment

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची