Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षेत वाढ!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर काल संशयित आरोपींकडून गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Group) बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारानंतर देशभरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.



वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून नाकाबंदी करण्याच्या सूचना


बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या हल्यानंतर मलबार हिल परिसरातील मंत्र्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेरही पोलीस तैनात केले आहेत. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मलबार हिल परिसरातील महत्वाच्या पाँईंटवर नाकाबंदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.



सोशल मीडियाद्वारे लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर २८ तासांनी लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, असे जबाबदारी घेताना त्यांनी म्हटले आहे.


Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन