Baba Siddique Death : बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमान खानला अश्रू अनावर!

मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे राजकीय नेत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) जवळचे मित्र होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी ऐकताच सलमान खानला अश्रू अनावर झाले आणि त्याने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी सलमान खानचे डोळे पाणावले होते. आपला जवळचा मित्र गमावल्याच दु:ख सलमान खानच्या चेहऱ्यावर दिसत होत.


या घटनेनंतर सलमान खानने बिग बॉस १८ चं शूटही रद्द केल्याची माहितीही समोर येत आहे. एकेकाळी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात वैर होते. पण बाबा सिद्दीकी यांनीच सलमान व शाहरुख खानमधील हे वैर संपवले. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टी यांच्यासह बॉलिवूडमधील इतर अनेक बड्या सेलिब्रिटींना आमंत्रित केल जायचं. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी मिळताच शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत लिलावती रुग्णालयात पोहोचली. यावेळी शिल्पाला देखील अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळतंय.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल