Accident News : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बसची कंटेनरला जोरदार धडक

१६ प्रवासी गंभीर जखमी


छत्रपती संभाजीनगर : राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident News) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसची समोर असणाऱ्या कंटेनरला जोददार धडक बसली. या धडकेत १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,आज पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात ही घटना घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव खासगी बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत १६ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली.


दरम्यान, जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. विकासाचा महामार्ग म्हणून ओळख निर्माण केलेल्या या महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्ग पोलिसांकडून अपघात रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे