Nitesh Rane : …तर उबाठाने स्वत:च्या ताकदीवर महाराष्ट्राची निवडणूक लढवावी!

Share

आमदार नितेश राणे यांचे खुले आव्हान

मुंबई : संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) काल रात्री मारलेल्या ९०चा परिणाम अजूनही उतरला नाही, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होतं. काल हरियाणामध्ये भाजपाचं (BJP) दाबून पराभव होतोय, असं घसा सुखेपर्यंत ओरडून बोलणाऱ्याला हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील एकही जागा जिंकता आली नाही, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला. तसेच संजय राऊतच्या मालक म्हणजे उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) बोचरी टीका करत स्वत:च्या ताकदीवर महाराष्ट्राची निवडणूक लढवा, असे खुले आव्हान दिले आहे.

हरियाणा राज्यामध्ये भाजपाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तर जम्मू काश्मीरमध्येही सर्वात जास्त वोट शेअर म्हणजे २९.१६ टक्के हा भाजपा पक्षाचा आहे. याबद्दलचं दु:ख संजय राजाराम राऊतच्या चेहऱ्यावर आज सकाळी पत्रकार परिषदेत दिसून येत होतं. ज्या दहा जनपथला काँग्रेस पक्षाची मम्मी बसते त्यांना साधं हरियाणा जिंकता आलं नाही. तसेच जम्मू काश्मीरमध्येही केवळ सहा सीट मिळाल्या म्हणून आज सामनातील अग्रलेखासह पत्रकार परिषदेतून संजय राजाराम राऊत काँग्रेसला मोठे डोळे वटारुन दाखवत होता. त्यामुळे संजय राजाराम राऊतने त्याच्या आणि मालकामध्ये हिंमत आणि लायकी असेल तर मविआमधून बाहेर येवून स्वत:च्या जोरावर, जीवावर, ताकदीवर महाराष्ट्राची निवडणूक लढवून दाखवा, असे खुले आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

उबाठाची तुलना भाजपा सोबत करण्याची लायकी नाही

हरियाणामध्ये स्वत:च्या ताकदीवर भाजपा पक्ष सत्तेवर आला आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या सर्व हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपा पक्षाला मतदान केलं. महायुती हा निवडणुका स्वत:च्या हिंमतीवर जिंकतो. महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन जिंकत नाही. त्यामुळे उबाठाची तुलना भाजपासोबत करण्याची तुमची लायकी नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी विरोधकांना लगावला.

त्याचबरोबर संजय राजाराम राऊतने त्याची आणि त्याच्या मालकाने ढुंगणात ताकद असेल तर यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला महाराष्ट्रातील २८८ जागा स्वत:च्या ताकदीवर लढणार हे जाहीर करावे. उगाच फुशारक्या मारुन दुसऱ्यांना सल्ले देण्याचं काम बंद करावे, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

उबाठा आणि काँग्रेस मनोरंजनाचं साधन

काँग्रेसने उबाठाला आणि उबाठाने काँग्रेसला सल्ले देणं म्हणजे वर्गातले दोन ‘ढ’ विद्यार्थी एक दुसऱ्याला मार्गदर्शन करतात असंच समज आहे. कारण लोकसभेमध्ये उबाठा आणि हरियाणा व जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नापास झालेला आहे. हे दोन्ही ‘ढ’ विद्यार्थी आपापसात भांडून स्वत:चेच कपडे फाडतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यांना केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहते, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

29 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

29 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

31 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

43 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

48 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago