मुंबई : दिवा आणि कोपरदरम्यान रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरचा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल रखडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्लो आणि फास्ट दोन्ही मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. लोकलची वाहतूक कोलमडल्याने कामावर जाणा-या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचं कामी हाती घेण्यात आलं आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. सकाळची वेळ असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…