ओमर अब्दुल्ला हे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री

श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुक २०२४चे अंतिम निकाल समोर आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने १० वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत ४९ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. एनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री बनणार आहेत.


निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नॅशनल कॉन्फरन्स ४२ जागा मिळाल्या आहेत. २९ जागा मिळवून भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.


नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यांना केवळ ३ जागा जिंकता आल्या. जम्मू-काश्मीर पीपल कॉन्फरन्स, सीपीआयएम आणि आप यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. तर ७ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Comments
Add Comment

Gujarat Tragedy : वडोदरा-हालोल महामार्गावर उभ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू, तर २६ प्रवासी जखमी

वडोदरा : गुजरात राज्याला (Gujrat News) हादरवून सोडणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना बुधवारी पहाटे घडली

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 जूनपूर्वी 'ही' गोष्ट पूर्ण करा

अन्यथा सबसिडी मिळण्यात अडचण

Delhi Police : राजधानीत दहशतवादी कट उधळला! ISI समर्थित नेटवर्कचा दिल्लीत पर्दाफाश; शस्त्रे-ड्रग्ज तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे.

Vadodara Accident : गुजरातमध्ये भीषण बस अपघात; ट्रकला धडकून 5 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Vadodara Accident: वडोदरा : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा-जारोड महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू (Death)

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Study Tours For Maharashtra Govt School : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे नशीब उजळले! आता 'NASA' आणि 'ISRO' ची सफर

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी