Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ओएनजीसीमध्ये २०००हून अधिक पदांची मेगाभरती

१०वी उत्तीर्णही करु शकतात अर्ज


मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. मात्र काहींचे उच्च शिक्षण पूर्ण नसल्याने त्यांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अपुरे राहते. अशाच तरुणांसाठी आनंधाची बातमी समोर आली आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ONGC) मेगाभरती जारी केली आहे. तब्बल २२३६ रिक्त पदांसाठी ही भरती जारी करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ओनजीसीमध्ये अप्रेंटिस पदासाठी (Apprentice Recruitment) ही भरती केली जाणार असून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत इच्छुक उमेदवारांना NAPS पोर्टल apprenticeshipindia.gov.in किंवा NATS पोर्टल nats.education.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज करावा लागणार आहे. तसेच २५ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.



शैक्षणिक पात्रता


उमेदवारांनी १०वी/१२वी / ITI/ डिप्लोमा / बीएससी / बीई / बीटेक / बीबीए पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच १८ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.



निवड प्रक्रिया


या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडीवर याबाबत माहिती देण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करुन निवड केली जाणार आहे.



वेत


अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांना ९ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. आयटीआय पदवी प्राप्त उमेदवारांनी ८०५० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तसेच ट्रेड अप्रेंटिससाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे.

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध