नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कोळसा खाणीत सोमवारी भीषण स्फोट झाला. सकाळी १०.३० वाजता भादुलिया ब्लॉकमधील कोळसा खाणीत ही घटना घडली. या स्फोटात सहाजण ठार झाले.
स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. गंगारामचक गावातील (जि.बीरभूम) खासगी कोळसा खाणीत ब्लास्टिंग सुरू असताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुरुवातीला स्फोटानंतर खाण कोसळली. त्यामुळे हा अपघात अधिक धोकादायक झाला. या दुर्घटनेत अनेक मजुरांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत.
यापूर्वी बीरभूम जिल्ह्यातील नलहाटी पोलिस स्टेशन हद्दीतील महेश गुडिया गावात दगड फोडताना दगडाच्या खाणीत अडकून जागीच काम करणाऱ्या तीन मजुरांचा मृत्यू झाला होता.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…