Horoscope : शनीचं होणार नक्षत्र परिवर्तन; डिसेंबरपर्यंत 'या' राशींच उजळणार भविष्य!

मुंबई : प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर आपली चाल परिवर्तन करतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत नक्षत्र परिवर्तन (Shani Nakshatra Parivartan) करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्ब्ल ३० वर्षांचा काळ लागतो. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रभाव काही राशींवर (Horoscope) होतो. त्यामुळे त्या राशीतील लोकांवर परिवर्तनाचा शुभ किंवा अशुभ परिणाम होतो.


ज्योतिषशास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच शनीने नक्षत्र परिवर्तन केले आहे. या परिवर्तनाचा परिणाम काही राशींवर पडणार असून त्या राशीतील लोकांच भविष्य पुढील दोन महिन्यांपर्यंत उजळून राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



वृषभ (Taurus Horoscope)


या राशीतील लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींपासून मुक्ती मिळणार आहे. तसेच केलेल्या मेहनतीचं चांगलंच फळ मिळेल. या काळात लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल. त्याचबरोबर नोकरीत चांगलं यश मिळेल.



तूळ (Libra Horoscope)


या राशीतील जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या नक्षत्राच्या परिवर्तन काळात चांगली नोकरी मिळेल. आयुष्यात सकारात्मकता वाढून मानसिक रुपात असणाऱ्या अडचणी दूर होतील. समाजात देखील या लोकांचा तुमचा मान-सन्मान वाढेल.



धनु (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्हाला प्रमोशनची चांगली संधी मिळेल. तसेच, तुमच्या घरातील कौटुंबिक वातावरण चांगलं असेल. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुमचा काळ चांगला जाईल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.


(टीप : वरील सर्व माहिती ज्योतिषशास्त्रांच्या आधारे दिली आहे. 'प्रहार' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करीत नाही. )

Comments
Add Comment

थिएटर रिलीजपूर्वी ‘बैटल ऑफ गलवान’ टीमकडून खास आदरांजली; लष्करी वीर आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित व्हिडिओ मालिका प्रदर्शित

मुंबई : Salman Khan Films ने ‘बैटल ऑफ गलवान’च्या प्रदर्शनापूर्वी एक खास व्हिडिओ मालिका प्रदर्शित केली असून, यात खऱ्या

Solar Eclipse: १७ फेब्रुवारीला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि दिवसभरात कोणत्या चूका टाळाव्यात?

मुंबई: खगोलशास्त्र आणि धार्मिक परंपरांमध्ये रस असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. या

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत