Horoscope : शनीचं होणार नक्षत्र परिवर्तन; डिसेंबरपर्यंत ‘या’ राशींच उजळणार भविष्य!

Share

मुंबई : प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर आपली चाल परिवर्तन करतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत नक्षत्र परिवर्तन (Shani Nakshatra Parivartan) करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्ब्ल ३० वर्षांचा काळ लागतो. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रभाव काही राशींवर (Horoscope) होतो. त्यामुळे त्या राशीतील लोकांवर परिवर्तनाचा शुभ किंवा अशुभ परिणाम होतो.

ज्योतिषशास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच शनीने नक्षत्र परिवर्तन केले आहे. या परिवर्तनाचा परिणाम काही राशींवर पडणार असून त्या राशीतील लोकांच भविष्य पुढील दोन महिन्यांपर्यंत उजळून राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.

वृषभ (Taurus Horoscope)

या राशीतील लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींपासून मुक्ती मिळणार आहे. तसेच केलेल्या मेहनतीचं चांगलंच फळ मिळेल. या काळात लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल. त्याचबरोबर नोकरीत चांगलं यश मिळेल.

तूळ (Libra Horoscope)

या राशीतील जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या नक्षत्राच्या परिवर्तन काळात चांगली नोकरी मिळेल. आयुष्यात सकारात्मकता वाढून मानसिक रुपात असणाऱ्या अडचणी दूर होतील. समाजात देखील या लोकांचा तुमचा मान-सन्मान वाढेल.

धनु (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्हाला प्रमोशनची चांगली संधी मिळेल. तसेच, तुमच्या घरातील कौटुंबिक वातावरण चांगलं असेल. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुमचा काळ चांगला जाईल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

(टीप : वरील सर्व माहिती ज्योतिषशास्त्रांच्या आधारे दिली आहे. ‘प्रहार’ अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करीत नाही. )

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago