सकाळी की संध्याकाळी, कोणत्या वेळेस दूध पिणे अधिक फायदेशीर?

मुंबई: आरोग्यासाठी दुधाला अतिशय फायदेशीर मानले जाते. अनेक दशकांपासून भारतात दररोज दूध पिण्याची परंपरा आहे. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जी चांगल्या आरोग्यासाठी अतिशय गरजेची असतात. जर तुम्ही दररोज एक ग्लास दूध पित असाल तर म्हातारपणापर्यंत तुम्ही निरोगी राहू शकता.


समोर आलेल्या अभ्यासानुसार गायीच्या दुधात ८७ टक्के पाणी आणि बाकी ३७ टक्के पोषकतत्वे असतात. दुधामध्ये १३ टक्के प्रोटीन याशिवाय फॅट, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, व्हिटामिन्स आणि अनेक गरजेची मिनरल्स असतात.


एका वयस्कर व्यक्तीलाल दररोज २२६ ग्रॅम म्हणजेच १ ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्य चांगले राहील. तुम्ही दूध कोणत्याही वेळेस प्यायले तरी फायदा होईल. मात्र रात्री झोपण्याआधी दूध घेतले तर त्याचे फायदे अधिक होतात.


झोपण्याच्या आधी दूध प्यायल्याने चांगली झोप लागण्यास मदत होते. कारण दुधामुळे झोपेसाठी लागणारे मेलाटोनिन हार्मोन वाढवते.


जर तुम्ही दिवसा दूध पित असाल तर यामुळे संपूर्ण दिवस भूक लागत नाही. अशातच ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी दिवसा दूध पिणे अतिशय लाभकारक ठरते.


दरम्यान, प्रत्येक व्यक्तीला दूध पिण्याने फायदा पोहोचेलच असे नाही. काही लोकांना दूध प्यायल्याने गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण