पतीशी फोनवर भांडण झाल्याने पत्नीने पोटच्या मुलीला संपवले

लखनऊ: उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे. पतीशी भांडण झाल्यानंतर एका महिलेने आपल्या ८ महिन्यांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.


न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी गुरूवारी सांगितले की एका महिलेने दावा केला होता की तिची आठ महिन्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. मात्र पोलिसांना तपासादरम्यान आढळले की आपल्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर चिडलेल्या पत्नीनेच आपल्या मुलीची हत्या केली होती.


ही घटना २९ सप्टेंबरला परसपूर भागात घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार मुलगी अनेकदा या दाम्पत्याच्या भांडणाचे कारण होत असे. २९ सप्टेंबरच्या रात्री फोन कॉलवर पतीसोबत भांडण झाल्यानंतर रागात असलेल्या पत्नीने आपल्या मुलीला घराजवळच्या सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले होते.त्यानंतर सकाळी दावा केला की तिची मुलगी बेपत्ता झाली आहे.


आरोपी महिलेचा पती कामानिमित्त मुंबईत राहत असे. तर पत्नी जगमती आपल्या सासरच्यांसोबत गावात राहत होती. सोमवारी सकाळी जगमतीने कुटुंबियांना सांगितले की तिची मुलगी शगुन बेपत्ता झाली आहे. तिने असा दावाही केला की तिला कोणीतरी जंगली प्राणीघेऊन गेला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता जगमतीच्या घराच्या मागे सेप्टिक टँकमध्ये मुलीचा मृतदेह आढळला.


पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर कोणतेही निशाण नव्हते. तिचा मृत्यू बुडल्यामुळे झाला. यानंतर पोलिसांनी जेव्हा जगमतीकडे चौकशी सुरू केली तेव्हा तिच्या विधानांमध्ये अंतर होते. जेव्हा तिच्याकडे कडक चौकशी केली असता तिनेच आपल्या मुलीला मारल्याची कबुली दिली.

Comments
Add Comment

Gujarat ATS : गुजरात एटीएसकडून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित मॉड्यूलचा पर्दाफाश , ८ आरोपी अटकेत

अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अनेक राज्यांमध्ये संयुक्त कारवाई करत, बंदी घातलेल्या

Waterfall Trip : धबधब्याखाली भिजायचंय? मग हे 5 वॉटरप्रूफ गॅझेट्स नक्की सोबत ठेवा

वॉटरफॉल ट्रिपची तयारी झाली? धबधब्याखाली (Waterfall) मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण तुमचा फोन, गॅझेट्स (Gadgets) आणि

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने