पतीशी फोनवर भांडण झाल्याने पत्नीने पोटच्या मुलीला संपवले

लखनऊ: उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे. पतीशी भांडण झाल्यानंतर एका महिलेने आपल्या ८ महिन्यांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.


न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी गुरूवारी सांगितले की एका महिलेने दावा केला होता की तिची आठ महिन्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. मात्र पोलिसांना तपासादरम्यान आढळले की आपल्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर चिडलेल्या पत्नीनेच आपल्या मुलीची हत्या केली होती.


ही घटना २९ सप्टेंबरला परसपूर भागात घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार मुलगी अनेकदा या दाम्पत्याच्या भांडणाचे कारण होत असे. २९ सप्टेंबरच्या रात्री फोन कॉलवर पतीसोबत भांडण झाल्यानंतर रागात असलेल्या पत्नीने आपल्या मुलीला घराजवळच्या सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले होते.त्यानंतर सकाळी दावा केला की तिची मुलगी बेपत्ता झाली आहे.


आरोपी महिलेचा पती कामानिमित्त मुंबईत राहत असे. तर पत्नी जगमती आपल्या सासरच्यांसोबत गावात राहत होती. सोमवारी सकाळी जगमतीने कुटुंबियांना सांगितले की तिची मुलगी शगुन बेपत्ता झाली आहे. तिने असा दावाही केला की तिला कोणीतरी जंगली प्राणीघेऊन गेला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता जगमतीच्या घराच्या मागे सेप्टिक टँकमध्ये मुलीचा मृतदेह आढळला.


पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर कोणतेही निशाण नव्हते. तिचा मृत्यू बुडल्यामुळे झाला. यानंतर पोलिसांनी जेव्हा जगमतीकडे चौकशी सुरू केली तेव्हा तिच्या विधानांमध्ये अंतर होते. जेव्हा तिच्याकडे कडक चौकशी केली असता तिनेच आपल्या मुलीला मारल्याची कबुली दिली.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या