जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदवार्ता! ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी आणले 'हे' नवीन प्लॅन

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओने (Reliance Jio) मोबाइल रिचार्जचे दर (Recharge Price Hike) वाढवले. यामुळे ऐन सणासुदीच्या महागाईत जिओ वापरकर्त्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली होती. या दरम्यान बीएसएनएलने (BSNL) रिचार्ज प्लान स्वस्त केले होते. त्यामुळे अनेक युझर्स फायद्यासाठी इतर पर्यायांचा वापर करत होते. परंतु रिचार्ज दरवाढ झाल्यानंतर जिओ वापरकर्त्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी नवीन प्लॅन काढले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या कोणते आहेत नवीन प्लॅन.



९९९ रुपयांचा प्लान


९९९ रुपयांमध्ये ९८ दिवसांचा प्लान मिळणार आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० फ्री एसएमएस मिळणार आहेत. जर तुम्ही जिओच्या 5G नेटवर्क परिसरात असाल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डाटा मिळणार आहे. या प्लानमध्ये एकून 196GB डेटा मिळणार आहे.



८९९ रिचार्ज प्लान


८९९ रुपयांचा रिचार्जमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल आणि १०० मोफत एसएमएस मिळतील. तसेच 5G नेटवर्क भागात 20GB अतिरिक्त डेटा आणि अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. या प्लानमध्ये एकूण 200GB डेटा मिळणार असून हा प्लॅन ९० दिवसांचा असणार आहे.

Comments
Add Comment

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक