Accident News : काळाचा घाला! देवीची ज्योत घेऊन येताना भाविकांनी भरलेले पिकअप व्हॅन पलटले

  59

दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी


सोलापूर : नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरुवात झाली असून सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशातच नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे ही घटना घडली. नवरात्रोत्सवासाठी देवीची ज्योत नेताना भाविकांनी भरलेले पिकअप व्हॅन स्त्याच्या कडेला असणाऱ्या एका खड्ड्यात पलटी झाले. व्हॅन थेट अंगावर कोसळल्यामुळे या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना दु:खाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक