Accident News : काळाचा घाला! देवीची ज्योत घेऊन येताना भाविकांनी भरलेले पिकअप व्हॅन पलटले

दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी


सोलापूर : नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरुवात झाली असून सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशातच नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे ही घटना घडली. नवरात्रोत्सवासाठी देवीची ज्योत नेताना भाविकांनी भरलेले पिकअप व्हॅन स्त्याच्या कडेला असणाऱ्या एका खड्ड्यात पलटी झाले. व्हॅन थेट अंगावर कोसळल्यामुळे या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना दु:खाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह