Accident News : काळाचा घाला! देवीची ज्योत घेऊन येताना भाविकांनी भरलेले पिकअप व्हॅन पलटले

दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी


सोलापूर : नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरुवात झाली असून सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशातच नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे ही घटना घडली. नवरात्रोत्सवासाठी देवीची ज्योत नेताना भाविकांनी भरलेले पिकअप व्हॅन स्त्याच्या कडेला असणाऱ्या एका खड्ड्यात पलटी झाले. व्हॅन थेट अंगावर कोसळल्यामुळे या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना दु:खाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक