सोलापूर : नवरात्रोत्सवाला (Navratrotsav) सुरुवात झाली असून सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशातच नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरहुन मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीकडे जाताना कामती येथे ही घटना घडली. नवरात्रोत्सवासाठी देवीची ज्योत नेताना भाविकांनी भरलेले पिकअप व्हॅन स्त्याच्या कडेला असणाऱ्या एका खड्ड्यात पलटी झाले. व्हॅन थेट अंगावर कोसळल्यामुळे या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना दु:खाचे वातावरण पसरले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…