Pune Helicopter Crash : भीषण अपघात! पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

पुणे : पुणे शहरातून (Pune) भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील बावधान परिसरात खासगी हेलिकॉप्टर कोसळून (Helicopter Crash) ३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बावधन परिसरात ही घटना घडली. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला. दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली असून परिसरातून धुराचे लोट पसरले होते.


दरम्यान, दाट धुक्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज असून या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले असून हिंजवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या नेतृत्वातील पथक या अपघाताची अधिक चौकशी करीत आहेत.

Comments
Add Comment

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह