Babar Azam: बाबर आझमने दुसऱ्यांदा दिला पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमने दुसऱ्यांदा कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबर पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार होता. याआधीही त्याने राजीनामा दिला होता. मात्र त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले होते. यावेळेस बाबरने वर्कलोडचे कारण सांगत पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय तो म्हणाला की त्याला आपल्या बॅटिंगवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.


२ ऑक्टोबरल बुधवारी बाबरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. बाबरने सोशल मीडियावर लिहिले, प्रिय चाहते, मी आज तुमच्यासोबत बातमी शेअर करत आहे. मी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.


 


बाबरने पुढे लिहिले, या संघाचे नेतृत्व करणे खरंच गौरवाची बाब आहे. मात्र आता वेळ आली आहे की मी हे पद सोडू आणि खेळण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करू. नेतृत्व करण्याचा अनुभव मोठा आहे. मात्र त्यासोबतच कामाचा बोजाही वाढतो. मला खेळाला प्राथमिकता द्यायची आहे. मला माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळेच तर मला आनंद मिळतो.



वर्षभराच्या आत दोनदा कर्णधारपदाचा राजीनामा


वर्षाच्या आत दुसऱ्यांदा बाबरने कर्णधारपदाचा राजीनामादिला आहे. याआधी त्याने वनडे वर्ल्डकप २०२३ नंतर कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. वनडे वर्ल्डकपनंतर बाबरने १५ नोव्हेंबर २०२३ला कर्णधारपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्यावेळेस बाबर पाकिस्तानच्या तीनही फॉरमॅटचा कर्णधार होता.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स