Babar Azam: बाबर आझमने दुसऱ्यांदा दिला पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा

  62

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमने दुसऱ्यांदा कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबर पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार होता. याआधीही त्याने राजीनामा दिला होता. मात्र त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले होते. यावेळेस बाबरने वर्कलोडचे कारण सांगत पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय तो म्हणाला की त्याला आपल्या बॅटिंगवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.


२ ऑक्टोबरल बुधवारी बाबरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. बाबरने सोशल मीडियावर लिहिले, प्रिय चाहते, मी आज तुमच्यासोबत बातमी शेअर करत आहे. मी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.


 


बाबरने पुढे लिहिले, या संघाचे नेतृत्व करणे खरंच गौरवाची बाब आहे. मात्र आता वेळ आली आहे की मी हे पद सोडू आणि खेळण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करू. नेतृत्व करण्याचा अनुभव मोठा आहे. मात्र त्यासोबतच कामाचा बोजाही वाढतो. मला खेळाला प्राथमिकता द्यायची आहे. मला माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळेच तर मला आनंद मिळतो.



वर्षभराच्या आत दोनदा कर्णधारपदाचा राजीनामा


वर्षाच्या आत दुसऱ्यांदा बाबरने कर्णधारपदाचा राजीनामादिला आहे. याआधी त्याने वनडे वर्ल्डकप २०२३ नंतर कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. वनडे वर्ल्डकपनंतर बाबरने १५ नोव्हेंबर २०२३ला कर्णधारपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्यावेळेस बाबर पाकिस्तानच्या तीनही फॉरमॅटचा कर्णधार होता.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार