जिओच्या नव्या प्लानने ग्राहकांची चांदी, एकदा रिचार्ज केल्यानंतर ३ महिने मिळणार फायदे

मुंबई: अनेकदा आपण रिचार्ज करत असताना कोणते रिचार्ज करावे हे लक्षात येत नाही. काहीजण सर्व रिचार्ज पारखून घेतात आणि त्यातील फायदेशीर आणि स्वस्त रिचार्ज निवडतात. यामुळे खिशावर अधिक ताण पडत नाही. हीच बाब लक्षात घेता टेलिकॉम कंपन्यांनी एकापेक्षा एक असे रिचार्ज प्लान्स आणले आहेत. यात जिओचा एक नवा प्लान जोडण्यात आला आहे. ९९९ रूपयांचा हा प्लान आहे.



जाणून घ्या या प्लानचे फायदे


जिओच्या ९९९ रूपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना ९८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ३ महिने रिचार्ज करावे लागणार नाही.


प्लानमध्ये दिवसाला २ जीबी डेटा दिला जातो जर ९८ दिवसांच्या हिशेबाने डेटा पाहिल्यास एकूण १९६ जीबी डेटा मिळतो. हा प्लान अनलिमिटेड ५ जी डेटासोबत येतो.


कॉलिंगसाठी प्रत्येक प्लानप्रमाणे यात अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देण्यात आला आहे. सोबतच यात दिवसाला १०० एसएमएस मिळतात. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा समावेश आहे.

Comments

प्रशांत    October 3, 2024 07:42 AM

अरे बापरे ३ महिने रिचार्ज करावे लागणार नाही.

Add Comment

Criminal Public Representatives : गुन्हेगार लोकप्रतिनिधींना सन्मानाची गरज नाही!

मुंबई : विधानमंडळ किंवा संसदेचे सदस्य (आमदार, खासदार) शासकीय कार्यालयात आल्यावर त्यांना उभे राहून अभिवादन

Pandharpur विठ्ठल मंदिर समितीच्या गोशाळेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळा विस्तारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानात विद्यार्थी शाळेत येण्याच्या निमित्ताने

Banks Closed : मे महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

मुंबई : मे 2026 महिन्यात देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, विविध सण, राष्ट्रीय आणि

Mira-Bhayandar terror scare : आरोपी जुबैर ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’

Mantralaya : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या