PM Narendra Modi : पंतप्रधानांचा ५ ऑक्टोबर रोजी असणार ठाणे दौरा!

  195

अनेक रस्ते बंद; 'असे' असतील पर्यायी मार्ग


मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amiyt Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. तर येत्या ५ ऑक्टोबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra) करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.


दरम्यान, पंतप्रधान मोदी ५ ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यावर असून ते ठाणे येथे रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत. यावेळी सुमारे ४० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे ठाण्यातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र प्रवाशांचा खोळंबा टळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.



काय आहेत पर्यायी मार्ग?



  • गुजरात येथून ठाण्यात येणारी वाहने विक्रमगडमार्गे नवी मुंबई येथून मुंबईच्या दिशेने जातील.

  • नाशिक कडून येणारी वाहने मुरबाड मार्गे कल्याण येथून मुंबईचा दिशेने जाणार आहेत.

  • मुंबई कडून येणारी वाहने ऐरोली मार्गे कल्याण येथे जाणार आहेत.

  • नवी मुंबई येथून येणारी वाहने कल्याणमार्गे नाशिक आणि गुजरातच्या दिशेने जाणार आहेत.

Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत