Jammu Kashmir: ४० जागा, ४१५ उमेदवार, जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात मतदान होईल. मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात होऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असेल. या टप्प्यात ७ जिल्ह्यातील ४० जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात दोन उपमुख्यमंत्र्‍यांसह ४१५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.


निवडणूक आयोगाने मतदानासाठी २० हजाराहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात केले आहेत. या टप्प्यात ३९.१८ लाख मतदार ५०६० मतदान केंद्रावर आपले मतदान करतील. १ ऑक्टोबरला जम्मू क्षेत्रातील जम्मू, उधमपूर, सांबा आणि कठुआ, उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा येथील ४० जागांवर मतदान होईल. मतदानादरम्यान सुरक्षेसाठी कडक व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.


दोन टप्प्यांबद्दल बोलायचे झाल्यास १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात ६१.३८टक्के मतदान झाले होते. तर २६ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्या ५७.३१ टक्के मतदान झाले होते.



या जागांवर होणार मतदान


या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बिश्नाह-एससी, सुचेतगड-एससी, आरएस पुरा, जम्मू दक्षिण, बाहु, जम्मू पूर्व, नगरोटा, जम्मू पश्चिम, जम्मू उत्तर, अखनूर-एससी आणि छंब, बानी, बिलावर, बसोहली, जसरोटा, कठुआ-एससी आणि हीरानगर, उधमपुर पश्चिम, उधमपुर पूर्व, चेनी आणि रामनगर-एससी आणि रामगढ़-एससी, सांबा आणि विजयपुर, करनाह, त्रेघम, कुपवाड़ा, लोलाब, हंदवाड़ा आणि लंगेट, सोपोर, रफियाबाद, उरी, बारामुल्ला, गुलमर्ग, वागूरा-क्रीरी आणि पट्टन, सोनावारी, बांदीपोरा, गुरेज ( एसटी) मतदान होईल.

Comments
Add Comment

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough