भारताच्या मालिका विजयाने बदलले WTC फायनलचे समीकरण, या ३ संघांमध्ये सरळ टक्कर

मुंबई: कानपूर कसोटीत भारताच्या बांगलादेशवरील विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल स्पर्धेचे समीकरण बदलत असल्याचे दिसत आहे. भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशला २-० असे हरवले. ३ दिवस पावसाने गोंधळ घातल्यानंतर भारताने आक्रमक खेळ करताना दुसरा कसोटी सामना ७ विकेटनी जिंकला. टीम इंडियासाठी ही चांगली बाब म्हणजे टेलमध्ये त्यांनी दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली आघाडी मिळवली आहे.



WTC पॉइंट्स टेबल


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबल पॉईंट्सच्या टक्केवारीवर आधारित बनवली जाते. भारत सध्या ७४.२४ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेशला क्लीन स्वीप दिल्यानंतर सलग तिसऱ्या फायनल खेळण्याच्या भारताच्या आशा वाढल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. त्यांचे पॉईंट्स ६२.५० आहेत तर तिसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. त्यांनी नुकतेच न्यूझीलंडला कसोटी मालिकेत २-० असे हरवले.



३ संघांमध्ये फायनलला टक्कर


भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात फायनलची टक्कर आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचाही समावेश होऊ शकतो. ते पुढीलम हिन्यांमध्ये बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहेत. जर द. आफ्रिकेने या सर्व मालिका जिंकल्या तर त्यांची टक्केवारी ७०पेक्षा अधिक होईल.

Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज