मान्सून परतीच्या मार्गावर, तापमानात वाढ

पुणे : परतीच्या प्रवासावर निघालेला मान्सून (monsoon) काही अडथळ्यांमुळे धीम्या गतीने पुढे सरकत आहे. मात्र, सोमवारपासून या प्रवासाला गती मिळत असून, आणखी वेगाने मान्सून परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मात्र मान्सून परतीच्या मार्गावर असताना, तापमानात वाढ होत आहे. मात्र यंदा पावसाने समाधानकारक कामगिरी केली आहे.


महाराष्ट्रातील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी केला गेला आहे. मात्र, कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पाऊस उघडीप देणार असून, काही ठिकाणी हलकी रिमझिम होण्याची शक्यता आहे.



'ऑक्टोबर हिट'चे संकेत


पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढत आहे. त्यामुळे 'ऑक्टोबर हिट'च्या सुरुवातीचे संकेत मिळत आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि बीड या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडतील, पण त्यातून कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी भारतात एकूण ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जे सरासरीच्या १०८ टक्के आहे. विशेषत: मध्य भारतात १९ टक्के आणि पूर्व-पूर्वोत्तर भागात १४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जूनमध्ये ११ टक्के कमी पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा