Atal Setuवर एसयूव्ही थांबवली आणि समुद्रात उडी मारत केली आत्महत्या

मुंबई: मुंबईच्या अटल सेतुवर एका व्यक्तीने आपली गाडी उभी करत समुद्रात उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की त्या व्यक्तीने आपली कार ट्रान्स हार्बरवर पार्क केल्यानंतर तेथून उडी मारली.


न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार ही घटना सकाळी १० वाजता घडली. या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन केले. मात्र त्या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती एसयूव्ही घेऊन पूलावर आली. गाडीला त्यांनी साईनबोर्डाकडे उभे केले आणि समुद्रात उडी घातली.



२२ किमी लांब अटल सेतु


अटल सेतुला मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या रूपामध्येही ओळखले जाते. यामुळे दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडता येते. या पुलाचे उद्घाटन या वर्षी जानेवारीत करण्यात आले होते. सहा लेनचा हा पूल २१.८ किमी लांब आहे आणि १६.५ किमी सी लिंकवर आहे.



याआधी डॉक्टर्स, इंजीनियर्सनीही दिला आहे जीव


अटल सेतुवर याआधीही अशा घटना समोर आल्या आहेत. येथे लोकांनी समुद्रात उडी मारत आपला जीव दिला आहे. गेल्या जुलै महिन्यात मुंबईत आर्थिक तंगीने त्रस्त झाल्याने ३८ वर्षीय इंजीनियर श्रीनिवासने अटल सेतुवरून समुद्रात उडी मारली होती. या व्यक्तीचा मृतदेहही आढळला नव्हता.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत