Atal Setuवर एसयूव्ही थांबवली आणि समुद्रात उडी मारत केली आत्महत्या

मुंबई: मुंबईच्या अटल सेतुवर एका व्यक्तीने आपली गाडी उभी करत समुद्रात उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की त्या व्यक्तीने आपली कार ट्रान्स हार्बरवर पार्क केल्यानंतर तेथून उडी मारली.


न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार ही घटना सकाळी १० वाजता घडली. या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन केले. मात्र त्या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती एसयूव्ही घेऊन पूलावर आली. गाडीला त्यांनी साईनबोर्डाकडे उभे केले आणि समुद्रात उडी घातली.



२२ किमी लांब अटल सेतु


अटल सेतुला मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या रूपामध्येही ओळखले जाते. यामुळे दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडता येते. या पुलाचे उद्घाटन या वर्षी जानेवारीत करण्यात आले होते. सहा लेनचा हा पूल २१.८ किमी लांब आहे आणि १६.५ किमी सी लिंकवर आहे.



याआधी डॉक्टर्स, इंजीनियर्सनीही दिला आहे जीव


अटल सेतुवर याआधीही अशा घटना समोर आल्या आहेत. येथे लोकांनी समुद्रात उडी मारत आपला जीव दिला आहे. गेल्या जुलै महिन्यात मुंबईत आर्थिक तंगीने त्रस्त झाल्याने ३८ वर्षीय इंजीनियर श्रीनिवासने अटल सेतुवरून समुद्रात उडी मारली होती. या व्यक्तीचा मृतदेहही आढळला नव्हता.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.