IND vs BAN: इंद्रदेवही नाही रोखू शकणार भारतीय संघाचा विजयरथ

कानपूर: भारतीय संघ आणि बांग्लादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या सुरूवातीचे ३ दिवस इंद्रदेव चांगलेच बरसले. यामुळे खेळावर मोठा परिणाम झाला. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाला होता. यात बांगलादेशने ३ विकेट गमावताना १०७ धावा केल्या होत्या.


सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ ओल्या मैदानामुळे होऊ शकला नव्हता. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय गोलंदाजांनी कहर केला. लंच ब्रेकनंतर बांगलादेशचा डाव २३३ धावांवर आटोपून लावला.



गोलंदाजांनंतर फलंदाजांचा कहर


या दरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३ विकेट मिळवल्या तर मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि स्पिनर रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी २-२ विकेट मिळवल्या. एक विकेट रवींद्र जडेजाने मिळवला. यानंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशवर जोरदार प्रहार केला.


भारतीय संघाने बेजबॉल गेम खळताना ९ बाद २८५वर डाव घोषित केला. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जायसवाल आणि रोहित शर्माने मैदानावर येताच बॅटिंग सुरू केली. जायसवाल आणि रोहितने मिळून ३ षटकांत ५१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा २३ धावा करून बाद झाला तर दुसरीकडे जायसवालने केवळ ३१ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचा खेळ ७२ धावांवर समाप्त झाला. दरम्यान, सामन्याचा एकच दिवस शिल्लक होता त्यामुळे फलंदाज जोरदार फटकेबाजीच्या इराद्याने मैदानावर उतरले होते. विराट कोहलीने ४७ तर केएल राहुलने ६८ धावांची वेगवान खेळी करत भारताला २८५ धावांवर पोहोचवले.

Comments
Add Comment

Smruti Mandhana : स्मृती मानधना टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकी महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला

IPL 2026 : गुजरातचा कोलकातावर पाच गडी राखून विजय

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी

Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

मुंबई :  मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल

IPL 2026 MI vs PBKS : "काही कठीण निर्णय घेण्याची गरज आली आहे - हार्दिक पांड्या" ; मुंबईच्या अंतर्गत वादाचा खेळावर परिणाम?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून

IPL : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव, पंजाबचा विजय, किंग्स झाले IPL टॉपर

मुंबई : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे

Pat Cummins, IPL 2026 : पॅट कमिन्स आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सज्ज; गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त

मुंबई : सिडनीमध्ये नुकत्याच झालेल्या स्कॅननंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोणत्याही