IND vs BAN: इंद्रदेवही नाही रोखू शकणार भारतीय संघाचा विजयरथ

  43

कानपूर: भारतीय संघ आणि बांग्लादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या सुरूवातीचे ३ दिवस इंद्रदेव चांगलेच बरसले. यामुळे खेळावर मोठा परिणाम झाला. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाला होता. यात बांगलादेशने ३ विकेट गमावताना १०७ धावा केल्या होत्या.


सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ ओल्या मैदानामुळे होऊ शकला नव्हता. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय गोलंदाजांनी कहर केला. लंच ब्रेकनंतर बांगलादेशचा डाव २३३ धावांवर आटोपून लावला.



गोलंदाजांनंतर फलंदाजांचा कहर


या दरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३ विकेट मिळवल्या तर मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि स्पिनर रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी २-२ विकेट मिळवल्या. एक विकेट रवींद्र जडेजाने मिळवला. यानंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशवर जोरदार प्रहार केला.


भारतीय संघाने बेजबॉल गेम खळताना ९ बाद २८५वर डाव घोषित केला. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जायसवाल आणि रोहित शर्माने मैदानावर येताच बॅटिंग सुरू केली. जायसवाल आणि रोहितने मिळून ३ षटकांत ५१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा २३ धावा करून बाद झाला तर दुसरीकडे जायसवालने केवळ ३१ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचा खेळ ७२ धावांवर समाप्त झाला. दरम्यान, सामन्याचा एकच दिवस शिल्लक होता त्यामुळे फलंदाज जोरदार फटकेबाजीच्या इराद्याने मैदानावर उतरले होते. विराट कोहलीने ४७ तर केएल राहुलने ६८ धावांची वेगवान खेळी करत भारताला २८५ धावांवर पोहोचवले.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार