IND vs BAN: इंद्रदेवही नाही रोखू शकणार भारतीय संघाचा विजयरथ

कानपूर: भारतीय संघ आणि बांग्लादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या सुरूवातीचे ३ दिवस इंद्रदेव चांगलेच बरसले. यामुळे खेळावर मोठा परिणाम झाला. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाला होता. यात बांगलादेशने ३ विकेट गमावताना १०७ धावा केल्या होत्या.


सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ ओल्या मैदानामुळे होऊ शकला नव्हता. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय गोलंदाजांनी कहर केला. लंच ब्रेकनंतर बांगलादेशचा डाव २३३ धावांवर आटोपून लावला.



गोलंदाजांनंतर फलंदाजांचा कहर


या दरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३ विकेट मिळवल्या तर मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि स्पिनर रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी २-२ विकेट मिळवल्या. एक विकेट रवींद्र जडेजाने मिळवला. यानंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशवर जोरदार प्रहार केला.


भारतीय संघाने बेजबॉल गेम खळताना ९ बाद २८५वर डाव घोषित केला. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जायसवाल आणि रोहित शर्माने मैदानावर येताच बॅटिंग सुरू केली. जायसवाल आणि रोहितने मिळून ३ षटकांत ५१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा २३ धावा करून बाद झाला तर दुसरीकडे जायसवालने केवळ ३१ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचा खेळ ७२ धावांवर समाप्त झाला. दरम्यान, सामन्याचा एकच दिवस शिल्लक होता त्यामुळे फलंदाज जोरदार फटकेबाजीच्या इराद्याने मैदानावर उतरले होते. विराट कोहलीने ४७ तर केएल राहुलने ६८ धावांची वेगवान खेळी करत भारताला २८५ धावांवर पोहोचवले.

Comments
Add Comment

IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड

BCCI Central Contracty Players List: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून 'या' पाच मोठ्या खेळाडूंची नावे गायब

दिल्ली: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून दुर्लक्षित खेळाडू: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील हंगामासाठी

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या

कॅनडा विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये कॅनडा विरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला.

बीसीसीआयच्या नव्या करारानुसार रोहित शर्मा, विराट कोहली ब श्रेणीचे खेळाडू

मुंबई : बीसीसीआयने सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रमुख खेळाडूंसाठी २०२५ - २६ च्या हंगामाचा नवा करार जाहीर केला.

ब गटात झिम्बाब्वे अव्वल स्थानी

ब्रायन बेनेट याचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल नवी दिल्ली  : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२०