Gopichand Padalkar : शरद पवार हे मिनी औरंगजेब; त्यांनीच धनगर समाजाचे वाटोळे केले

आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका


मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे मिनी औरंगजेब असून त्यांनीच धनगर समाजाचे (Dhangar community) वाटोळे केले असल्याची जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.


शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. शरद पवार आपल्या आयुष्यात फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे ही घोषणाबाजी करणारे लोक कोण आहेत? याची देखील चौकशी झाली पाहिजे. मराठ्यांसोबतच धनगर समाजाचे वाटोळे हे शरद पवारांनीच केले आहे, असा घाणघातही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.



देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या दुकानाला कुलूप लावले


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरिबांचे कवच कुंडल आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या दुकानाला कुलूप लावले, हे पवारांचे दुखणे आहे. त्यामुळे पवार साहेब नेहमी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत. शरद पवार फुकटची हवा करत आहेत. शरद पवारांच्या ५० वर्षाच्या राजकारणात कधी त्यांनी १०० आमदारही निवडून आणले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण काहीही बदललेले नाही. त्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्तांनी आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हायला हवे, असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये