Gopichand Padalkar : शरद पवार हे मिनी औरंगजेब; त्यांनीच धनगर समाजाचे वाटोळे केले

  136

आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका


मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे मिनी औरंगजेब असून त्यांनीच धनगर समाजाचे (Dhangar community) वाटोळे केले असल्याची जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.


शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. शरद पवार आपल्या आयुष्यात फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे ही घोषणाबाजी करणारे लोक कोण आहेत? याची देखील चौकशी झाली पाहिजे. मराठ्यांसोबतच धनगर समाजाचे वाटोळे हे शरद पवारांनीच केले आहे, असा घाणघातही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.



देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या दुकानाला कुलूप लावले


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोरगरिबांचे कवच कुंडल आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या दुकानाला कुलूप लावले, हे पवारांचे दुखणे आहे. त्यामुळे पवार साहेब नेहमी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत. शरद पवार फुकटची हवा करत आहेत. शरद पवारांच्या ५० वर्षाच्या राजकारणात कधी त्यांनी १०० आमदारही निवडून आणले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण काहीही बदललेले नाही. त्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्तांनी आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हायला हवे, असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली