Raj Thackeray : मनसेचे नेते राज ठाकरे यांना झालंय तरी काय?

दीपक मोहिते


मुंबई : मनसे (MNS) आगामी निवडणुकीत किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी पक्षाचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) हे गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्याचे दौरे करत आहेत. नाशिक व ठाणे जिल्ह्यात त्यांचा पक्ष फार नाही, पण एखाद दोन जगावर चांगली लढत देईल. पण त्यांना जागा जिंकणे, अशक्य आहे. या निवडणुकीसाठी (Assembly Election) राज ठाकरे हे सतत दौऱ्यावर आहेत,पण त्यांना अद्याप सूर सापडलेला नाही.त्यांच्या प्रचारात कुठेतरी वैचारिक गोंधळ निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत हेच राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक व पुण्यात प्रचारात जाहीर सभा घेत होते. आज तेच राज ठाकरे महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढत सर्वत्र फिरताना दिसत आहेत, हा बदल म्हणावा कि वैचारिक गोंधळ,अशा संभ्रमावस्थेत मनसे सैनिकांसह मतदार देखील सापडले आहेत.


गेल्या दोन दिवसात त्यांनी महायुतीच्या " मुख्यमंत्री,माझी लाडकी बहीण" योजनेवर (Mazi Ladki Bahin Yojana) तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यात त्यांच्यामध्ये झालेल्या या बदलामागे नक्की काय कारणे आहेत, हे कळायला मार्ग नाही. अशा परिस्थितीमध्ये ते "एकला चलो रे" भूमिकेत येऊन ही निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागतात,यामागे निश्चित एक रणनिती असावी.


लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेली नेत्रदीपक कामगिरी लक्षात घेऊन शिंदे गट व भाजपने त्यांना स्वबळावर ही विधानसभा लढवण्यास भाग पाडले असावे. उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या मराठी माणसाच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी राज याना त्यांनी या निवडणुकीत उतरवले असावे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. कारण काल परवापर्यंत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,प्रसाद लाड,आशिष शेलार,प्रवीण दरेकर,हे राज ठाकरे यांच्या इमारतीच्या गॅलरीत अधून मधून पाहायला मिळत होते.तेच राज ठाकरे आता लाडकी बहीण योजनेवरून शिंदे सरकारवर आगपाखड करू लागले आहेत.याला आपण त्यांचा वैचारिक गोंधळ म्हणायचं कि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अपशकुन करण्याची भाजप व शिंदे गटांनी आखलेली रणनिती समजायचे ? असा प्रश्न मतदारासमोर उभा ठाकला आहे.

Comments

Satish Marotrao Samarth    September 29, 2024 04:46 PM

He is Raj Thakeray. He is doing the right kind of Politics, which is very rare in present worst Political scenario. He praises the good deeds and criticizes the bad deeds. He is representing common man. The common man who is expecting focus on primary problems like Employment, Pollution, and many more. He has shown through his Blue print, what he is happening and what people are expecting from Politics. Agree with him or not, is not his problem, It's Yours. Thanks.

Add Comment

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)