सांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश असून, गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये पारसनाथ वनमोरे (४०), त्यांचा मुलगा शाहीराज (१२), आणि प्रदीप वनमोरे (३५) यांचा समावेश आहे. आणखी एक जण, हेमंत वनमोरे (२५), या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज सकाळी शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पारसनाथ वनमोरे यांना शेतात तुटलेली वीजवाहक तार पडल्यामुळे शॉक लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. वडिलांना शोधण्यासाठी गेलेला मुलगा शाहीराजही त्या तारेच्या संपर्कात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, प्रदीप वनमोरे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील विजेचा धक्का बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला.
ही दुर्दैवी घटना संपूर्ण म्हैसाळ गावासाठी धक्कादायक ठरली असून ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…