सणासुदीपुर्वी ट्रक मालवाहतूक दरात वाढ

  74

मुंबई (प्रतिनिधी) : ऑगस्ट २०२४ मध्ये ट्रकच्या मालवाहतूक भाडेदरात वाढीचा कल कायम राहीला असून, सलग दुसऱ्या महिन्यात त्यात वृध्दी झाल्याचे श्रीराम मोबिलिटी बुलेटिनच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आगामी सणासुदीच्या हंगामामुळे आणि निवडणुकीनंतर आर्थिक उलाढालींच्या वाढलेल्या वेगामुळे विविध वाहतूक मार्गांवर मालवाहतुकीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.


विशेष म्हणजे, भारत-बांगलादेशच्या सीमा प्रदेशात मालवाहतूक वाहन ताफ्याच्या वापरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. वापर ४०टक्केवरुन ६० टक्केपर्यंत वाढला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार पुर्ववत झाल्याने कोलकाता-गुवाहाटी-कोलकाता मार्गावरील ट्रक मालवाहतूक दरात वाढ झाली असून ती सर्वाधिक ३.० टक्के नोंदविली गेली आहे. दिल्ली-कोलकाता-दिल्ली आणि दिल्ली-हैदराबाद-दिल्ली या मार्गांवर देखील अनुक्रमे २.७ टक्के आणि २.३ टक्के वाढ झाली आहे.


सफरचंदाचा हंगाम आणि विधानसभा निवडणुक मतदानाअगोदर श्रीनगर भागात मालवाहतुकीचे दरात वाढ सुरु झाली आहे. या भागात ऑगस्टमध्ये मालवाहतुकीचे दर जवळपास १० टक्के वाढले आहे. वायनाड प्रदेशात ट्रकची संख्या घटल्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. तेथे बरेच ट्रक हे पुनर्वसन कार्यात गुंतलेले आहेत.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व