ग्रंथसखा : कविता आणि काव्यकोडी

ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी
तुकारामांची गाथा
एकनाथांचे भागवत
वाचायचे आहे आता

व्यासांचे महाभारत
वाल्मीकींचे रामायण
रामदासांचा दासबोध
वाचायला उत्सुक मन

मोरोपंतांची केकावली
विनोबांची गीताई
कालिदासांचे शाकुंतल
वाचायची मला घाई

टिळकांचे गीतारहस्य
रवींद्रनाथांची गीतांजली
गदिमांचे गीतरामायण
वाचायची इच्छा झाली

सावरकरांचे माझी जन्मठेप
खांडेकरांची ययाती
अत्रेंचे कऱ्हेचे पाणी
वाचायला घेणार हाती

अष्टदर्शने, श्यामची आई,
जैत रे जैत, अपूर्वाई
विशाखा, सलाम, मेंदी
वाचायची अशीही काही

पुस्तके जरी छोटी मोठी
विचार नवा देतात
ग्रंथसखा होऊन आपले
आयुष्य घडवतात

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) मंगळला दोन
गुरूला त्रेसष्ट
शनीला मात्र
साठापेक्षा जास्त

बुध व शुक्रला
एकही नाही
ग्रहाभोवती कोण बरं
सदा फिरत राही?

२) डोक्यावर बसणे
डोळ्यांत खुपणे
छाती दडपणे
हात आखडणे

शब्दशः अर्थापेक्षा
वेगळा अर्थ कळे
भाषेचे सौंदर्य
खुले कुणामुळे ?

३) भूदानाचा मंत्र त्यांनी
भारतीयांना दिला
‘सर्वोदय’ हा उन्नतीचा
मार्ग सांगितला

‘गीताई’तून भगवद्‌गीतेचा
अर्थ सोपा केला
‘सब है भूमी गोपाल की’
हा संदेश कुणी दिला?

उत्तर -

१) उपग्रह 
२) वाक्प्रचार 
३) विनोबा भावे
Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले