Mumbai News : मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटला! पाणीपुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी असणारे धरणे,नदी-नाले तुडुंब भरले गेले आहेत. तसेच मुंबई शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या सर्व धरणे देखील काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी प्रश्न सुटणार आहे.


मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांजवळ पोहचला आहे. आज सकाळी ६ वाजता या जलाशयांमधील पाणीसाठा १४,३९,२७१ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच एकूण ९९.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे.



कोणत्या धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा?



  • अप्पर वैतरणा - ९९.७९ टक्के पाणीसाठा

  • मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा

  • तानसा - ९९.५८ टक्के पाणीसाठा

  • मध्य वैतरणा - ९८.७९ टक्के पाणीसाठा

  • भातसा - ९९.३५ टक्के पाणीसाठा

  • विहार - १०० टक्के पाणीसाठा

  • तुलसी - १०० टक्के पाणीसाठा

Comments
Add Comment

BMC Election 2026 : भाजप-शिवसेना वरळीतून फुंकणार प्रचाराचे रणशिंग! ३ जानेवारीला भव्य सभा

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची तोफ धडाडणार मुंबई : जागावाटप आणि बंडखोरांची मनधरणी करून झाल्यानंतर,

Navnath Ban : संजय राऊत म्हणजे ‘पोपटलाल’, त्यांना मुंबईत ‘खान’ महापौर करायचा आहे; भाजप नेते नवनाथ बन यांचा टोला

“पत्राचाळीत मराठी माणसाला कुणी देशोधडीला लावलं?” मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो बँक बॅलेन्स तपासा! खात्यात नेमके किती हप्ते जमा झाले? पहा सरकारची नवीन वर्षाची भेट

मुंबई : राज्यभरातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी संमिश्र

Nitesh Rane : मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार; मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना डिवचले

'बुरखेवाली' महापौर होण्याची भीती वाटत नाही का? मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला