Ujjain: उज्जैनच्या महाकाल मंदिराबाहेर भिंत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू

मुंबई: उज्जैनच्या(ujjain) महाकालेश्वर मंदिराच्या गेट नंबर ४ समोर मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाहून अधिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची स्थिती नाजूक सांगितली जात आहे. त्यांना उज्जैन आणि इंदौरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


उज्जैन कलेक्टर आणि महाकालेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष नीरज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय दोघांची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्ह्ला प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत.


उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गेटनंबर ४ समोर जुनी भिंत होती. ही भिंत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रंगरंगोटी करण्यात आली होती. या भिंतीच्या वरच्या भागात मध्य प्रदेश पर्यटन विकास निगमने एक लक्झरी हॉटेल बनवले आहे. या हॉटेलच्या गार्डनचे संपूर्ण पाणी या भिंतीच्या रस्त्याच्या खाली उतरत होते. शुक्रवारी उज्जैनमध्ये संध्याकाळी ४ वाजल्यापासून सातत्याने जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे संपूर्ण पाण्याने भिंतीवर दबाव बनला होता. यामुळे भिंत अतिशय नाजूक झाली होती.


ही भिंत त्या लोकांवर कोसळली जे महाकालेश्वर मंदिरात येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रसाद, फूल इत्यादींची विक्री करण्याचे काम करत होते. या दुर्घटनेत एक महिला आणि एका पुरुषाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर जखमींवर उपचार केले जात आहेत.

Comments
Add Comment

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला