काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन

धुळे : खान्देशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील यांचे दीर्घ आजाराने आज, शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. मागच्या काही दिवसांपासून रोहिदास पाटील आजारी होते. त्यांच्यावर उद्या, शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रोहिदास पाटील हे धुळे (ग्रामीण) आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून पाटलांची ओळख होती, तसेच पाटलांचं संपूर्ण आयुष्य कॉंग्रेसमध्ये गेलं. रोहिदास पाटलांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे पद भूषवले होते. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. शनिवारी सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचा अंत्यविधी होणार आहे.



राजकीय कारकीर्द


रोहिदास पाटील यांना राजकीय वारसा घरातूनच लाभला. वडील चुडामण पाटील हे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. १९६२, १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत चुडामण पाटील यांनी विजय मिळविला होता. हा वारसा रोहिदास पाटील यांनी पुढे चालवला. जवाहरच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची जहागिरी कायम ठेवली. जुन्या कुसुंबा विधानसभा मतदारसंघातून ते १९८५ हा एक अपवाद वगळता १९७८ ते २००९ पर्यंत आमदार होते.


या दरम्यान, त्यांनी राज्याचे कृषीमंत्रीपदाची जबाबदारी अत्यंत उत्तमरित्या सांभाळली होती. २००९ मध्ये मात्र पाटील यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर २०१४ मध्ये कुणाल पाटील यांनी मोदी लाटेतही तब्बल ४६ हजार मतांनी विजय मिळवत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला. २०१९ मध्येही कुणाल पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत