Team India: कानपूर कसोटीत ३ स्पिनर की ३ पेसर? प्लेईंग ११वर टीम इंडियाचा सस्पेन्स

मुंबई: कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये २७ सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ३ स्पिनरसोबत उतरणार आहे की तीन वेगवान गोलंदाजांसोबत उतरणार? यावर सन्पेन्स कायम आहे. खरंतर, टीम इंडियाच्या असिस्टंट कोचने सामन्याच्या आधी प्रेस कॉन्फरन्समध्ये टीम कॉम्बिनेशनबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.


उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी दोन पिच तयार केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीरने ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सामन्याच्या पूर्वसंध्येला ऑप्शन प्रॅक्टिसदरम्यान दोन्ही पिचचे निरीक्षण केले. पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पावसाची भविष्यवाणी करण्यात आली आहे.


भारताने चेन्नईत दोन स्पिनर आणि तीन वेगवान गोलंदाजांसोबत खेळ केला होता. जर भारत कानपूरमध्ये तीन स्पिनर्ससोबत खेळण्याचा पर्याय निवडत असेल तर अतिरिक्त स्पिनर अक्षर पटेल अथवा कुलदीप यादव यांच्यापैकी एक असू शकतो.



भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत(विकेटकीपर), ध्रुव जुरेल, आर. अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत