Team India: कानपूर कसोटीत ३ स्पिनर की ३ पेसर? प्लेईंग ११वर टीम इंडियाचा सस्पेन्स

  36

मुंबई: कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये २७ सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ३ स्पिनरसोबत उतरणार आहे की तीन वेगवान गोलंदाजांसोबत उतरणार? यावर सन्पेन्स कायम आहे. खरंतर, टीम इंडियाच्या असिस्टंट कोचने सामन्याच्या आधी प्रेस कॉन्फरन्समध्ये टीम कॉम्बिनेशनबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.


उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी दोन पिच तयार केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीरने ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सामन्याच्या पूर्वसंध्येला ऑप्शन प्रॅक्टिसदरम्यान दोन्ही पिचचे निरीक्षण केले. पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पावसाची भविष्यवाणी करण्यात आली आहे.


भारताने चेन्नईत दोन स्पिनर आणि तीन वेगवान गोलंदाजांसोबत खेळ केला होता. जर भारत कानपूरमध्ये तीन स्पिनर्ससोबत खेळण्याचा पर्याय निवडत असेल तर अतिरिक्त स्पिनर अक्षर पटेल अथवा कुलदीप यादव यांच्यापैकी एक असू शकतो.



भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत(विकेटकीपर), ध्रुव जुरेल, आर. अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी