पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात!

  99

दीपक मोहिते

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते एकूण १२ प्रकल्पाचे भुमीपूजन करणार आहेत. पण ज्या एस.पी.महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे, त्या मैदानावर प्रचंड चिखल झाल्यामुळे सभेची जागा बदलण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) पथकाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) घाईघाईने या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात येत आहे. तसेच लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे मोदी व शहा या दोघांनी " मिशन महाराष्ट्र," हाती घेतले आहे. या अंतर्गत त्यांनी अनेक प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा सपाटा लावला आहे.

अवघ्या दीड तासाच्या त्यांच्या या दौऱ्यात ते अत्यंत वेगाने १२ प्रकल्पाचे भूमिपूजन व तसेच उदघाटने पार पाडणार आहेत. त्यानंतर ६.५५ वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत.संध्याकाळी जर पुन्हा पावसाला सुरुवात झाली तर मोदी यांच्या सभेचे ठिकाण बदलण्यात येणार आहे, पर्यायी व्यवस्था म्हणून गणेश कला व संस्कृती मंडळाचे सभागृह राखीव ठेवण्यात आले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे व सोलापूर,नांदेड,या शहरात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मोदी व शहा यांनी या शहरात येजा सुरू केली आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेदेखील पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे