नेवासात महामार्गावर टायर पेटवून महामार्ग अडविला, धनगर समाजाचे उपोषण स्थळाजवळील प्रकार...

आंदोलकांनी महामार्गावरून टायर बाजूला करून महामार्ग केला मोळका...


सरकारने दखल न घेतल्यास दोन दिवसांनी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा अंदोलकांचा इशारा..


नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा फाटा येथे मागील आठ दिवसांपासून धनगर समाजाच्या सुरू उपोषणाची दखल न घेतल्याने बुधवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी अहमदनगर - संभाजीनगर महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. यावेळी महामार्गावर दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. आंदोलकांनी महामार्गावरील टायर बाजूला करत महामार्गावर खुला केला.


धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा १८ सप्टेंबर पासून धनगर समाजाने सुरू केलेल्या आमरण उपोषणास ८ दिवस होवून ही न्याय मिळत नसल्याने कार्यकर्ते झाले आक्रमक झाले. बुधवारी दुपारी अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर समर्थकांनी टायर पेटवून नेवासा फाटा येथे महामार्ग अडवला. तर उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी महामार्गावर पेटवली टायर बाजूला करून वाहतूक महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.अचानक महामार्गावर टायर पेटवून टाकल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपोषण स्थळी दाखल झाले.


सरकारने व स्थानिक प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने दि.२७ रोजी अहमदनगर - संभाजीनगर महामार्गावरील गोदावरी नदीत जलसमाधी घेणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी देवून सरकारचे लक्ष वेधले आहे.धनगर समाजाशिवाय सत्तेत कोणीही येऊ शकत नाही महाराष्ट्रात तीन ठिकाणी राज्यव्यापी उपोषण चालू आहेत. तरी राज्य सरकार दुर्लक्ष का करते? हा प्रश्न धनगर समाजाला पडला आहे असे ते म्हणाले.उपोषण कर्ते प्रल्हाद सोरमारे व रामराव कोल्हे या दोघांची प्रकृती खालवली असून वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.


येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व आमदार, खासदार यांना त्यांची जागा दाखवून देवू उपोषण स्थळी कुठलेही नेते मंडळी आले नाही आमच्या भावना सरकार पर्यत कशा पोहचणार त्यामुळे आता फक्त जलसमाधी हाच एक पर्याय असल्याचे उपोषण कर्ते प्रल्हाद सोरमारे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात