Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीरच्या २६ जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या २६ जागांवर आज बुधवार २५ सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या टप्प्यात २३९ उमेदवार रिंगणात आहेत. साधारण २.५ लाख मतदार आज घराच्या बाहेर निघत मतदान करतील आणि सर्व उमेदवारांच्या नशिबाचा फैसला करतील.


२०१४ पासून आतापर्यंत १० वर्षांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आधी पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबरला २४ जागांवर झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ जागांवर होत आहे. मतदानादरम्यान प्रत्येक पोलिंग बूथवर सुरक्षा व्यवस्था कडक असेल.


मिळालेल्या माहितीनुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने २६ क्षेत्रांमध्ये ३५०२ मतदान केंद्र उभारली आहेत. यामुळे मतदार आरामात कोणत्याही त्रासाशिवाय मताधिकाराचा वापर करतील.


जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाअंतर्गत श्रीनगर जिल्ह्यातील ९३ उमेदवार मैदानात आहेत. तर बडगाममध्ये ४६ उमेदवार, राजौरी जिल्ह्यात ३४, पूंछ जिल्ह्यात २५, गांदेरबलमध्ये २१ आणि सियासीमध्ये २० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे